पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या 'ऑपेरेशन ऑल आऊट'ला सुरुवात, आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली

जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. २५ पर्यटक आणि एका काश्मिरी तरुणाचा मृत्यूनंतर, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोदी सरकारकडून ऑपेरेशन ऑल आऊटला सुरुवात झाली आहे. याद्वारे भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांची घरे उध्वस्त केली आहेत.


गेल्या सहा दिवसांत सुरक्षा दलांनी १० स्थानिक दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली असून आणि पुढेही हे ऑपेरेशन सुरूच राहण्याची शक्यता आहे.


आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत त्यात लष्कर-ए-तैयबाचा आदिल हुसेन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचा अमीर नझीर वाणी, जमील अहमद शेर गोजरी, द रेझिस्टन्स फ्रंटचा अदनान सफी दार आणि फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.

 



सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, अहसान उल हकने २०१८ मध्ये "पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले" आणि अलीकडेच तो खोऱ्यात "घुसखोर" झाला; तर लष्करचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहे, तसेच झाकीर अहमद गनी हा देखील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली पाळत ठेवत होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, फारुख अहमद टेडवा हा पाकिस्तानातून काम करत आहे. तर गेल्या मंगळवारी पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यात आदिल हुसेन ठोकर थेट सहभाग असल्याचा संशय आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचा संपूर्णपणे खात्मा करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे पोलिस प्रवक्त्यानी सांगितले आहे.

हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक पावले उचलली आहेत. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसा सेवा रद्द केल्या आहेत. सरकारच्या या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानने ही मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याची धमकी दिली आहे. ज्यामध्ये सिमला करार चा देखील समावेश आहे. १९७१ च्या युद्धानंतर स्वाक्षरी झालेल्या सिमला करारात युद्धबंदी रेषेला नियंत्रण रेषा म्हणून ओळखले जाण्याची तरतूद आहे आणि जर पाकिस्तानने ती स्थगित केली तर ते नियंत्रण रेषेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करेल.

Comments
Add Comment

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या

Child Protection Act : इंस्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातींप्रकरणी सरकारची मेटाला नोटीस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इंस्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींद्वारे प्रसारित होणाऱ्या बाल लैंगिक शोषण आणि