जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफने शेतकऱ्यांना आदेश दिला आहे. जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा असा आदेश सर्व शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. हा आदेश भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील शून्य रेषेदरम्यान जमीन असलेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अधिकृतरित्या प्रसिद्धीपत्रक काढून आदेशाची घोषणा झालेली नाही. पण शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला आहे.



अमृतसर, तरणतारन, फिरोजपूर आणि फाजिल्का या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची कापणी पूर्ण करुन ४८ तासांत शेतजमिनी मोकळ्या करुन देण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थिती चिघळली तर सुरक्षा पथकांकडून काही दरवाजे बंद केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनीपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. ही बाब विचारात घेऊन सीमा सुरक्षा दलाने शेतकऱ्यांना कापणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.



भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील शून्य रेषेपासून भारतीय बाजूच्या सीमेवरील कुंपणापर्यंत शेतकऱ्यांची अंदाजे ४५ हजार एकर जमीन आहे. सीमा सुरक्षा दलाकडून आदेश येताच शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सैनिकांनी कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त यंत्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.

अवघ्या ४८ तासांत कापणी पूर्ण करणे हे काम अनेक शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. गुरांच्या चाऱ्यासाठी वर्षभराचे नियोजन कापणीतून केले जाते. अनेक शेतकऱ्यांसाठी अल्पावधीत काम पूर्ण करणे कठीण आहे. पण परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी युद्धपातळीवर कापणीची कामं हाती घेतली आहेत.

तीव्र उष्णतेच्या लाटेपूर्वी कामं पूर्ण करा एवढाच तोंडी आदेश आहे. पण या आदेशाचा काही जण वेगळाच अर्थ काढत आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. शेतकऱ्यांना कापणीसाठी डेडलाईन जाहीर करणारा कोणताही लेखी आदेश काढलेली नाही; असे सीमा सुरक्षा दलाकडून जाहीरपणे सांगितले जात आहे.
Comments
Add Comment

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या

रायसिन विष बनवणाऱ्या सैयदचा पाकिस्तानशी संबंध उघड

ड्रोनद्वारे आणले शस्त्र, आयएसकेपीशी फोनवर संपर्क अहमदाबाद : प्रसादात विष कालवून लक्षावधी लोकांचा बळी घेण्याचे

Bihar Election Result 2025 : बिहारचे 'किंगमेकर' नितीश कुमार! महिला मतदारांच्या पाठिंब्याने '१० व्यांदा' मुख्यमंत्री होणार ?

पटणा : बिहार निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की एनडीएने राज्यात प्रचंड बहुमत मिळवून सत्ता पुन्हा

Bihar Election Result 2025 : 'टांगा पलटी, घोडं फरार!' प्रशांत किशोर यांचा पहिल्याच निवडणुकीत सपशेल पराभव; आता राजकारण सोडून 'कलटी' मारणार?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे राजकीय प्रयोग जन सुराज पार्टीसाठी (Jan Suraj Party) पहिल्या