Solapur to Goa Flight Service : सोलापूरहून थेट गाठता येणार गोवा! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

सोलापूर : सोलापूरकरांची (Solapur News) आतुरता असलेल्या विमानसेवेसंदर्भातील महत्वाची माहिती आता समोर आली आहे. मागील काहीं वर्षांपासून होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. याबाबत केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल, असे कळविले होते. त्यानंतर आता अखेर सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Solapur to Goa Flight Service)



जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २६ मेपासून सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. फ्लाय ९१ या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून २६ मे रोजी पासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही विमानसेवा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्यानंतर अखेर सोलापूर ते गोवा दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी नव्या पर्यायाचा लाभ घेता येणार आहे.



विमानसेवेआड येणारी चिमणी जमीनदोस्त


सोलापूर येथील होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळाजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वीज निर्मिती चिमणी मोठी अडचण बनली होती. ती चिमणी विमान उड्डाण मार्गात अडथळा निर्माण करत असल्याने डीजीसीए (DGCA) कडून उड्डाणास परवानगी मिळत नव्हती. मात्र नऊ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर दीड वर्षांपूर्वी ती चिमणी जमीनदोस्त करण्यात आली.



विमानतळावर इंधन सुविधाही उपलब्ध


मात्र, त्यानंतर पुन्हा ४२ सीट्स असलेल्या छोट्या विमानांऐवजी ७२ सीट्स असलेली विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर आणखी एक अडचण समोर आली, ती म्हणजे विमानतळावर इंधन पुरवठ्याची सुविधा नव्हती. मात्र प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर इंधनाच्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. (Solapur to Goa Flight Service)

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद