Nitesh Rane : हिंदू म्हणून एकत्र या, हे सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे

मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास


दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे तुम्ही हिंदू म्हणून एकत्र उभे राहा, भक्कमपणे उभे राहा, तुमच्यामुळेच आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. ज्यांचे हात तुमच्या दिशेने दगड भिरकावतील, त्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि हाच विश्वास देण्यासाठी आज मी इथे दापोलीला आलो आहे, असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोलीतील धर्म सभेमध्ये उपस्थित हिंदू बांधवांना दिला. अडखळ बंदरात काही दिवसांपूर्वी पार्किंगवरून झालेल्या मारहाणीत हिंदू तरुणांना मारहाण झाली होती. खरे पाहता ही जागा बंदर विभागाची असताना तिथे अनधिकृत पार्किंग होत होते. या सगळ्याची दखल राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेत मारहाण झालेल्या हिंदू तरुणांची भेट घेतली.



यानंतर झालेल्या धर्मसभेत बोलताना नितेश राणे म्हणाले, तुम्ही कुणीही घाबरण्याचे कारण नाही, या सगळ्याचा हिशोब करायला मी इथे आलो आहे. सुरुवात त्यांनी केली आहे, या सगळ्याचा हिशोब होणार आहे. आमच्या लोकांची डोकी फोडली आहेत, त्यामुळे हिशोब बरोबरीचा झाला पाहिजे. इथल्या हिंदू समाजाने लक्षात ठेवायचे की, आता काळजीचे दिवस गेले आहेत, आता डोकी फोडण्याचे दिवस गेलेत, आता आपण सत्तेत आहोत, हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. आमच्यासारखे भगवाधारी मंत्री म्हणून तुमच्यासोबत आले आहोत, तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणी बघत असेल, तर त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी मंत्रालयात पोहोचलो आहोत.


तुम्ही काळजी करू नका, खरेतर त्यांनी दगड मारण्याआधी या खात्याचा मंत्री कोण आहे, हे बघायला हवे होते. यांनीच अनधिकृत बांधकाम करायची, नियम तोडायचा, चुकीच्या ठिकाणी डंपर लावायचे, कायदे मोडायचे आणि मग दगड आमच्यावरच मारायचे, असे कसे चालेल असा सवाल विचारताना मंत्री नितेश राणे म्हणाले कदाचित ते विसरले असतील गृहखात्याचे मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी नेता आहेत. तिथे देवेंद्र फडणवीस बसले आहेत याचा त्यांना विसर पडला आहे, आठवण करून द्यायला मी आहे आणि तुम्हाला विश्वास द्यायला, ताकद द्यायला आलो आहे राज्याचा मंत्री म्हणून मी इथे आलो आहे, हे हिंदुत्ववादी सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे

Comments
Add Comment

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

मुंबईतील २९५ बेकरींवर महापालिकेचा 'प्रहार'; बेकरींना 'पीएनजी-एलपीजी' किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरणे बंधनकारक

मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

१५ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

कोणत्या देशानं घेतला निर्णय? कोपनहेगन : मुलांना व्यसनापासून वाचवण्यासाठी डेनमार्क सरकारनं एक मोठा निर्णय घेतला

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठा डेटा सेंटर; ‘गुगल’ ची १० अब्ज डॉलर्सची मेगा गुंतवणूक

विशाखापट्टणम : टेक कंपनी गूगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी