Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पाकिस्तानी हिंदूमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने मोठी घोषणा करताना स्पष्ट केले आहे की पाकिस्तानी हिंदूचा व्हिसा रद्द होणार नाही.


पाकिस्तानी हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे लोग जे भारतात राहत आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही. हे पाऊल मानवजातीला अनुसरून उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे हिंदू शरणार्थींची चिंता संपली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की ज्या पाकिस्तानी हिंदूंना लाँग टर्म व्हिसा जारी करण्यात आला आहे त्यांना परत जावे लागणार नाही. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने हिंदू पलायन करून भारतात आले आहेत आणि येथील नागरिकतासाठी अर्ज करत आहेत. एका रिपोर्टनुसार, हजारो पाकिस्तानी हिंदू शरणार्थी विविध भारतीय शहरांमध्ये राहत आहेत.



दिल्लीपासून ते गुजरातपर्यंत हिंदू शरणार्थी


राजस्थानच्या जोधपूर, जैसलमेर, बाडमेर आणि बिकानेर सारख्या जिल्ह्यांमध्ये हिंदू शरणार्थींची संख्या मोठी आहे. जोधपूरमध्ये तर अनेक बेकायदेशीर कॉलनीज बनवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील मजनू का टीला आणि आदर्शनगर या भागांमध्ये पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहे. दरम्यान, यातील काही शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. गुजरातच्या कच्छ आणि अहमदाबादमध्येही पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहेत. जम्मू शहरात साधारण २६ हजार ३१९ पाकिस्तानी हिंदू शरणार्थींची कुटुंबे आहेत.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू