पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्या पर्यटकांना ठार करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा पथकाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीआधारे तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. या तीन अतिरेक्यांना सुरक्षा पथके शोधत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी तिन्ही अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करुन माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती सुरक्षा पथकांना मिळाली. यानंतर सुरक्षा पथकांनी तातडीने कारवाई केली.







जरी तीन रेखाचित्रे प्रसिद्ध केली असली तरी आणखी काही अतिरेकी स्थानिक मदतनीस म्हणून सहभागी झाले होते. यात त्राल येथील आसिफ शेख हा एक अतिरेकी होता.

सुरक्षा पथकांना आदिल आणि आसिफ शेख या दोघांची घरे जम्मू काश्मीरमध्येच असल्याचे कळले. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकांनी या घरांवर धाड टाकली. एका अतिरेक्याच्या घरात आयईडी आढळला. यानंतर बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने आयईडी न हलवता तिथेच स्फोट करुन नष्ट करणे हाच पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले. यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन स्फोट करण्यात आला. अतिरेक्याचे घर आयईडी स्फोटात नष्ट झाले. यानंतर दुसऱ्या अतिरेक्याच्या घरावर बुलडोझर फिरवून ते घर पाडण्यात आले. दोन्ही घरे नष्ट झाली आहेत. पण अद्याप अतिरेकी सापडलेले नाहीत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.



आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. यातील आदिलचे बिजबेहारातील गुरी येथील घर बुलडोझरने पाडण्यात आले. तसेच अतिरेकी आसिफ शेखचे घर स्फोटकांनी नष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात