Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम


बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी क्लासिक (NC Classic) भालाफेक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राने सोमवारी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आमंत्रण दिले होते. पण मंगळवार २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्यांना ठार करण्यात आले. तब्बल २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. या घटनेने देशाला धक्का बसला. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू झाली आणि नीरज चोप्राचे सोमवारी दिलेले आमंत्रण वादाच्या भोवऱ्यात सापडले.

पाकिस्तानच्या भालाफेकपटूला भारतातील स्पर्धेसाठी विशेष आमंत्रण दिल्याबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका सुरू झाली. अखेर नीरजने ट्वीट करुन टीकाकारांची तोंड बंद केली.

मी मितभाषी आहे. पण चुकीचं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध बोलतो. माझ्या देशप्रेम आणि निष्ठेविषयी कोणी शंका उपस्थित करत असेल अथवा प्रश्न विचारत असेल तर मला बोलावंच लागेल. नाहक माझ्याविषयी अथवा माझ्या कुटुंबातील सदस्यांविषयी बदनामी करणारी वक्तव्य होत असतील तर ती खोडून काढावीच लागतील.

ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताकडून मी सहभागी झालो. आमच्या कामगिरीनंतर दोघांच्या आयांची एकमेकींशी भेट झाली, त्यावेळी अनेकांनी या क्षणांचे विशेष कौतुक केले. आज अर्शदला एका स्पर्धेसाठी भारतात आमंत्रित केले तर थेट माझ्या आणि माझ्या आईच्या देशप्रेमावरच शंका उपस्थित केली जात आहे. हे खूप जास्त होत आहे.

अर्शदला आमंत्रण दिले ते एक खेळाडू म्हणून. एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला अशा स्वरुपाचे हे आमंत्रण होते. हे आमंत्रण सोमवारी २१ एप्रिल रोजी दिले होते. जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा पहलगामची घटना घडली नव्हती. पण मंगळवारी पहलगाममध्ये जे घडले त्यानंतर अर्शद उपस्थित राहण्याचा प्रश्नच उरलेला नाही. देश, देशप्रेम, देशाविषयीची निष्ठा हे कधीही सर्वोच्चच असेल, असे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला.



मला विश्वास आहे की आपल्या देशाचा प्रतिसाद एक राष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवेल आणि न्याय मिळेल..." ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि न्याय मिळेल, असे नीरजने ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

त्याने पुढे लिहिलं, 'मी अभिमानाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. जेंव्हा माझ्या देशप्रेमावर शंका उपस्थित होते, तेव्हा ती वेदना एकदम खोलवर पोहोचते. कोणत्याही योग्य कारणाशिवाय काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका करत आहेत. आम्ही साधे आणि शांत लोक आहोत. माझ्याविषयी काही माध्यमांनी बनवलेल्या खोट्या बातम्या मी खोडून काढत नाही, याचा अर्थ त्या सत्य आहेत, असं नाही.
Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.