Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

Share

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच इथे एक भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि पुन्हा एकदा काश्मीरचं वातावरण हादरलं. या हल्ल्याची जबाबदारी घेतली द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेनं. आणि लगेचच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला.. ही नवी संघटना नक्की कोणती? कुठून आली? आणि या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालीद नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊ या…

द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना काही अचानक उदयास आलेली नाही. तिचा थेट संबंध लष्कर-ए-तोयबासोबत आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ही संघटना सक्रिय झाली. आणि फार कमी वेळातच काश्मीरमध्ये आपली मुळे रोवली. या संघटनेनं लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांतील सक्रिय दहशतवाद्यांना एकत्र आणलं. पहेलगाममधील ताज्या हल्ल्याचंही नियोजन याच संघटनेनं केलं. हल्ल्याबाबत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे दहशतवादी थेट नियंत्रण रेषा पार करून २०० किलोमीटर आतपर्यंत कसे आले? आणि त्यांनी भारतीय लष्कराच्या पंचतारांकित सुरक्षाव्यवस्थेला भेदलं तरी कसं?

द रेझिस्टन्स फ्रंटनं यामागचं कारण दिलं आहे की, कलम ३७० नंतर भारत सरकारनं काश्मीरमध्ये बाहेरच्या ८५,००० नागरिकांना वसाहती दिल्या, जे आधी पर्यटक म्हणून आले, आणि आता तिथेच स्थायिक होत आहेत. पण हे कारण केवळ वरवरचं आहे. खरा उद्देश आहे काश्मीरमध्ये पुन्हा भीती आणि अशांतीचं वातावरण निर्माण करणं.

या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड आहे सैफुल्ला खालीद, ज्याला सैफुल्ला कसुरी असंही म्हणतात. आता पाहू हा सैफुल्ला खालीद आहे तरी कोण? तो लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ आहे आणि दहशतवादी हाफिज सईदचा अत्यंत जवळचा माणूस. पाकिस्तानमध्ये त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाते. काही महिन्यांपूर्वी त्याने पाकिस्तानातील पंजाबमधल्या कंगनपूरमध्ये भाषणात म्हटलं की, “जितके भारतीय सैनिक माराल, अल्लाह तितकं इनाम देईल.” त्याने अबोटाबादच्या जंगलात दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबीर घेतलं होतं. आणि पहेलगाम हल्ल्यासाठी कोण दहशतवादी सहभागी असतील याची निवडही त्यानेच केली होती.

द रेझिस्टन्स फ्रंटकडे हेड स्क्वॉड आणि फाल्कन स्क्वॉड सारखी खतरनाक मॉड्युल्स आहेत जे भविष्यात आणखी मोठे हल्ले करू शकतात. या घटनेनंतर भारतीय लष्करानं शोध मोहीम सुरू केलीय. ३-४ दहशतवाद्यांचे स्केचेस तयार करण्यात आलेत. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला अलर्टवर ठेवण्यात आलंय. तर तिकडं पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसफ म्हणाले की, “पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही.” पण लक्षात ठेवा – २६/११ हल्ल्यावेळीही पाकिस्तानने हाच दावा केला होता. त्यामुळे आता देशाचं लक्ष आहे… मोदी सरकार या हल्ल्याचं उत्तर कसं देणार? पुन्हा एकदा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक होणार का? हे पाहावं लागणार आहे.

Recent Posts

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

33 minutes ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

51 minutes ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

1 hour ago

भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…

1 hour ago

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

2 hours ago