Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच इथे एक भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि पुन्हा एकदा काश्मीरचं वातावरण हादरलं. या हल्ल्याची जबाबदारी घेतली द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेनं. आणि लगेचच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला.. ही नवी संघटना नक्की कोणती? कुठून आली? आणि या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालीद नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊ या...


द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना काही अचानक उदयास आलेली नाही. तिचा थेट संबंध लष्कर-ए-तोयबासोबत आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ही संघटना सक्रिय झाली. आणि फार कमी वेळातच काश्मीरमध्ये आपली मुळे रोवली. या संघटनेनं लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांतील सक्रिय दहशतवाद्यांना एकत्र आणलं. पहेलगाममधील ताज्या हल्ल्याचंही नियोजन याच संघटनेनं केलं. हल्ल्याबाबत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे दहशतवादी थेट नियंत्रण रेषा पार करून २०० किलोमीटर आतपर्यंत कसे आले? आणि त्यांनी भारतीय लष्कराच्या पंचतारांकित सुरक्षाव्यवस्थेला भेदलं तरी कसं?


?si=VPu5UFEILUBJEF5J

द रेझिस्टन्स फ्रंटनं यामागचं कारण दिलं आहे की, कलम ३७० नंतर भारत सरकारनं काश्मीरमध्ये बाहेरच्या ८५,००० नागरिकांना वसाहती दिल्या, जे आधी पर्यटक म्हणून आले, आणि आता तिथेच स्थायिक होत आहेत. पण हे कारण केवळ वरवरचं आहे. खरा उद्देश आहे काश्मीरमध्ये पुन्हा भीती आणि अशांतीचं वातावरण निर्माण करणं.


या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड आहे सैफुल्ला खालीद, ज्याला सैफुल्ला कसुरी असंही म्हणतात. आता पाहू हा सैफुल्ला खालीद आहे तरी कोण? तो लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ आहे आणि दहशतवादी हाफिज सईदचा अत्यंत जवळचा माणूस. पाकिस्तानमध्ये त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाते. काही महिन्यांपूर्वी त्याने पाकिस्तानातील पंजाबमधल्या कंगनपूरमध्ये भाषणात म्हटलं की, “जितके भारतीय सैनिक माराल, अल्लाह तितकं इनाम देईल.” त्याने अबोटाबादच्या जंगलात दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबीर घेतलं होतं. आणि पहेलगाम हल्ल्यासाठी कोण दहशतवादी सहभागी असतील याची निवडही त्यानेच केली होती.



द रेझिस्टन्स फ्रंटकडे हेड स्क्वॉड आणि फाल्कन स्क्वॉड सारखी खतरनाक मॉड्युल्स आहेत जे भविष्यात आणखी मोठे हल्ले करू शकतात. या घटनेनंतर भारतीय लष्करानं शोध मोहीम सुरू केलीय. ३-४ दहशतवाद्यांचे स्केचेस तयार करण्यात आलेत. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला अलर्टवर ठेवण्यात आलंय. तर तिकडं पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसफ म्हणाले की, “पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही.” पण लक्षात ठेवा – २६/११ हल्ल्यावेळीही पाकिस्तानने हाच दावा केला होता. त्यामुळे आता देशाचं लक्ष आहे... मोदी सरकार या हल्ल्याचं उत्तर कसं देणार? पुन्हा एकदा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक होणार का? हे पाहावं लागणार आहे.

Comments
Add Comment

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत