Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या जवळजवळ असंख्य पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज गुरूवारी २४ एप्रिल पहाटे ३.३० वाजता मुंबई विमानतळावर Star Airlines VTGSI ने - Terminal 1 येथे सुखरूप पोहचली.


या सर्व पर्यटकांच्या चेहऱ्यावर मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना कश्मीर मधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या मोठ्या जीवघेण्या संकटातून व बिकट प्रसंगातून सुखरूप आपल्या भूमीत परत आल्याच्या व सुटकेचा निश्वास सुटल्याचा आनंद दिसत होता.


शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, युवा सेना सरचिटणीस राहूल कनाल तसेच पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर आज पहाटे उपस्थित राहून या सर्व पर्यटकांचे शुभेच्छा व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.


मुंबईत सुरक्षित पोहचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तसेच महायुती सरकारने प्रसंगावधान दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या सर्व पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रती कृतज्ञतेचे भाव व आभार व्यक्त केले.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव नाहक गमवावा लागला. तर २० जण यात जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री