मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या जवळजवळ असंख्य पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज गुरूवारी २४ एप्रिल पहाटे ३.३० वाजता मुंबई विमानतळावर Star Airlines VTGSI ने – Terminal 1 येथे सुखरूप पोहचली.
या सर्व पर्यटकांच्या चेहऱ्यावर मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना कश्मीर मधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या मोठ्या जीवघेण्या संकटातून व बिकट प्रसंगातून सुखरूप आपल्या भूमीत परत आल्याच्या व सुटकेचा निश्वास सुटल्याचा आनंद दिसत होता.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, युवा सेना सरचिटणीस राहूल कनाल तसेच पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर आज पहाटे उपस्थित राहून या सर्व पर्यटकांचे शुभेच्छा व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
मुंबईत सुरक्षित पोहचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तसेच महायुती सरकारने प्रसंगावधान दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या सर्व पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रती कृतज्ञतेचे भाव व आभार व्यक्त केले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव नाहक गमवावा लागला. तर २० जण यात जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…