Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या जवळजवळ असंख्य पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज गुरूवारी २४ एप्रिल पहाटे ३.३० वाजता मुंबई विमानतळावर Star Airlines VTGSI ने - Terminal 1 येथे सुखरूप पोहचली.


या सर्व पर्यटकांच्या चेहऱ्यावर मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना कश्मीर मधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या मोठ्या जीवघेण्या संकटातून व बिकट प्रसंगातून सुखरूप आपल्या भूमीत परत आल्याच्या व सुटकेचा निश्वास सुटल्याचा आनंद दिसत होता.


शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, युवा सेना सरचिटणीस राहूल कनाल तसेच पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर आज पहाटे उपस्थित राहून या सर्व पर्यटकांचे शुभेच्छा व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.


मुंबईत सुरक्षित पोहचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तसेच महायुती सरकारने प्रसंगावधान दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या सर्व पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रती कृतज्ञतेचे भाव व आभार व्यक्त केले.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव नाहक गमवावा लागला. तर २० जण यात जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील