प्रहार    

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

  77

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले आहेत.

पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट समाप्त केला आहे. ते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.

 

आज कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटीची बैठक आहे त्यात ते सामील होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प आणि सौदीचे राजा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत फोनवर बातचीत झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्च स्तरीय बैठकही घेतली.

पंतप्रधान मोदींनी केली हल्ल्याची निंदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ते सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले की, ज्यांनी हे असे कृत्य केले आहे त्यांना कटघऱ्यामध्ये आणले जाईल. कोणतीही दया केली जाणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प दृढ आहे.

दहशतवाद्यांचा शोध सुरू

या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे वेक्टर फोर्स, स्पेशल फोर्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे. या अभियानात सर्वात पुढे आहे ते वेक्टर फोर्स. कारण या खोऱ्यात निर्णायक कारवाईसाठी त्यांना ओळखले जाते.
Comments
Add Comment

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील

Bengluru Blast: बेंगळुरूमध्ये स्फोट! १० वर्षीय मुलाचा मृत्यू , तर १२ जण जखमी

बेंगळुरू: शुक्रवारी बेंगळुरूमधील विल्सन गार्डनच्या चिन्मयनपाल्य भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एका १० वर्षीय