PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले आहेत.


पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट समाप्त केला आहे. ते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.


 


आज कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटीची बैठक आहे त्यात ते सामील होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प आणि सौदीचे राजा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत फोनवर बातचीत झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्च स्तरीय बैठकही घेतली.



पंतप्रधान मोदींनी केली हल्ल्याची निंदा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ते सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले की, ज्यांनी हे असे कृत्य केले आहे त्यांना कटघऱ्यामध्ये आणले जाईल. कोणतीही दया केली जाणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प दृढ आहे.

दहशतवाद्यांचा शोध सुरू


या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे वेक्टर फोर्स, स्पेशल फोर्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे. या अभियानात सर्वात पुढे आहे ते वेक्टर फोर्स. कारण या खोऱ्यात निर्णायक कारवाईसाठी त्यांना ओळखले जाते.
Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन