Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!

  91

चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त


बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. काल रात्रीच्या सुमारास बारामुल्लामध्ये झालेल्या भारताची घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून १० किलो आयईडी (IED) आणि शस्त्रसाठा जप्त झाला आहे.



१६१ इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर मयंक शुक्ला (Brigadier Mayank Shukla) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलांना (Indian Security Forces) गुप्तचर संस्थांकडून उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल सतत माहिती मिळत होती. . २२ आणि २३ एप्रिलच्या मध्यरात्री, पहाटे १ वाजता, भारतीय सैन्याला उरी नाल्याजवळील एका लॉन्चपॅडवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. त्यानंतर काल रात्री घुसखोरीविरोधी मोहीम राबवण्यात आली. यावेळी एलओसीजवळील दहशतवाद्यांच्या हालचालींचा मार्ग काढण्यात आला आणि त्यांनी पहाटे ३ वाजता एलओसी ओलांडली. दोन तास सतत गोळीबार झाल्यानंतर, सुरक्षा दलांनी हल्ला करून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.


त्याचबरोबर "आमच्या सुरक्षा दलांनी या घनदाट जंगलात निर्जंतुकीकरण आणि शोध मोहीम राबवली. जम्मू आणि काश्मीर पोलीस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत - २ एके रायफल, एक ९ मिमी चायनीज पिस्तूल, मॅगझिन आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा. याव्यतिरिक्त, एक १० किलो आयईडी देखील जप्त करण्यात आला आहे...", असे ते म्हणाले.


Comments
Add Comment

Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान

प्रवास झाला स्मार्ट ! ‘हायवे यात्रा’ अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती नवी दिल्ली : जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केलेय. राज्याच्या

मोबाईलवरून आता मतदान

ई-मतदानाला परवानगी देणारे बिहार पहिले राज्य मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी ही सुविधा पाटणा :

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार