Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!

  105

चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त


बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. काल रात्रीच्या सुमारास बारामुल्लामध्ये झालेल्या भारताची घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून १० किलो आयईडी (IED) आणि शस्त्रसाठा जप्त झाला आहे.



१६१ इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर मयंक शुक्ला (Brigadier Mayank Shukla) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलांना (Indian Security Forces) गुप्तचर संस्थांकडून उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल सतत माहिती मिळत होती. . २२ आणि २३ एप्रिलच्या मध्यरात्री, पहाटे १ वाजता, भारतीय सैन्याला उरी नाल्याजवळील एका लॉन्चपॅडवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. त्यानंतर काल रात्री घुसखोरीविरोधी मोहीम राबवण्यात आली. यावेळी एलओसीजवळील दहशतवाद्यांच्या हालचालींचा मार्ग काढण्यात आला आणि त्यांनी पहाटे ३ वाजता एलओसी ओलांडली. दोन तास सतत गोळीबार झाल्यानंतर, सुरक्षा दलांनी हल्ला करून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.


त्याचबरोबर "आमच्या सुरक्षा दलांनी या घनदाट जंगलात निर्जंतुकीकरण आणि शोध मोहीम राबवली. जम्मू आणि काश्मीर पोलीस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत - २ एके रायफल, एक ९ मिमी चायनीज पिस्तूल, मॅगझिन आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा. याव्यतिरिक्त, एक १० किलो आयईडी देखील जप्त करण्यात आला आहे...", असे ते म्हणाले.


Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने