Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!

चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त


बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. काल रात्रीच्या सुमारास बारामुल्लामध्ये झालेल्या भारताची घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून १० किलो आयईडी (IED) आणि शस्त्रसाठा जप्त झाला आहे.



१६१ इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर मयंक शुक्ला (Brigadier Mayank Shukla) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलांना (Indian Security Forces) गुप्तचर संस्थांकडून उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल सतत माहिती मिळत होती. . २२ आणि २३ एप्रिलच्या मध्यरात्री, पहाटे १ वाजता, भारतीय सैन्याला उरी नाल्याजवळील एका लॉन्चपॅडवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. त्यानंतर काल रात्री घुसखोरीविरोधी मोहीम राबवण्यात आली. यावेळी एलओसीजवळील दहशतवाद्यांच्या हालचालींचा मार्ग काढण्यात आला आणि त्यांनी पहाटे ३ वाजता एलओसी ओलांडली. दोन तास सतत गोळीबार झाल्यानंतर, सुरक्षा दलांनी हल्ला करून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.


त्याचबरोबर "आमच्या सुरक्षा दलांनी या घनदाट जंगलात निर्जंतुकीकरण आणि शोध मोहीम राबवली. जम्मू आणि काश्मीर पोलीस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत - २ एके रायफल, एक ९ मिमी चायनीज पिस्तूल, मॅगझिन आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा. याव्यतिरिक्त, एक १० किलो आयईडी देखील जप्त करण्यात आला आहे...", असे ते म्हणाले.


Comments
Add Comment

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी