Pahalgam Terror Attack : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याविरुद्ध सरकार कोणतं पाऊल उचलते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष आहे. यादरम्यान आज बुधवारी संरक्षण मंत्री राजधान सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी जनतेला संबोधित करताना, दहशतवादावर प्रहार केला जाईल अशी घोषणा केली.


काश्मीरच्या पहलगाममध्ये निशस्त्र पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांच्या प्रमुखांना चोख प्रत्युत्तर देणार असे आश्वासन राजनाथ सिंह यांनी जनतेला दिले. ते पुढे असे देखील म्हणाले की, सरकार प्रत्येक आवश्यक आणि उपयुक्त पावलं उचलत आहेत. ज्यांनी ही घटना घडवून आणली त्यांच्यापर्यंतच नाही, तर ज्यांनी पडद्यामागे राहून हा हत्याकांड घडवून आणला त्यांच्यापर्यंतही पोहोचू, असा घणाघात देखील त्यांनी केला. राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य पाकिस्तानसाठी एक स्पष्ट इशाराच मानला जात आहे.



जोरदार प्रत्युत्तर मिळेल: संरक्षक मंत्री राजनाथ सिंह


राजनाथ सिंह आज बुधवारी जनतेला संबोधित करताना म्हणाले, "मी देशवासियांना आश्वासन देतो की, भारत सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल. भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांपर्यंत तर आम्ही पोहोचू पण मागे राहून असं दुष्कृत्य करणाऱ्या त्यांच्या प्रमुखांना सुद्धा सोडणार नाही. भारत ही इतकी जुनी संस्कृती आणि इतका जुना देश आहे की, अशा दहशतवादी कृत्यांनी त्याला घाबरवता येणार नाही. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना लवकरच जोरदार प्रत्युत्तर मिळेल."

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे