फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी काँग्रेसचा राजीनामा देत थेट भाजपात उडी घेतली आणि त्या पाठोपाठ आता माजी काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनीही भाजपा प्रवेशाचे संकेत दिले आहेत. ‘फडणवीसांचं नेतृत्व आवडतं, ते सांगतील तशी वाटचाल करणार’ या वक्तव्यानं त्यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट करत काँग्रेससाठी नवा पेच निर्माण केला आहे.


सत्यजित तांबे म्हणतात, "फडणवीसांसोबत काम करताना एक वेगळाच अनुभव येतो. त्यांचे नेतृत्व स्पष्ट आहे, ते दिशा दाखवतात, ताकद देतात. त्यामुळे माझी पुढची वाटचाल काय असेल हे ते ठरवतील." एवढं म्हणताना त्यांनी भाजपाकडे वाट वळवल्याचे अघोषित संकेत दिले.



तांबे यांनी काँग्रेसबद्दलची नाराजीही थेटपणे व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, काँग्रेसमध्ये सध्या भ्रमनिरास पसरलेला आहे. पक्षात पराभूत नेत्यांकडे लक्ष दिलं जातं, विजयी नेत्यांकडे नाही. महाविकास आघाडीच्या काळात सत्ता असूनही जनाधार असलेल्या नेत्यांना महामंडळं मिळाली नाहीत, ही पक्षाची मोठी चूक होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय.


त्यांच्या शब्दांतून एक वेदना होती की, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आणि पुन्हा सामील होण्यासाठी कित्येकदा विनंती करावी लागली, तरीही दारं उघडली गेली नाहीत. त्यांना वाटतंय की काँग्रेसमध्ये आता नेतृत्व करतायत ते लोक जनाधाराविना आहेत आणि यामुळे पक्षाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होणार आहे.


या पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे भाजपात गेले, आता तांबेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांचं ‘फडणवीस सांगतील तसं’ हे विधान म्हणजे प्रत्यक्ष भाजपाप्रवेशाची पूर्वसूचना तर नाही ना? राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू