Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला मिळतात. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरात ट्रकच्या धडकेत एस टी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बसच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.



कोल्हापुरातील चंदगडमध्ये बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून ट्रकच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


गेल्या अनेक दिवसापासून बेळगाव वेंगुर्ला रस्ताच्या रुंदीकरण रखडलं आहे. त्यामुळे, येथे अपघाताच्या घटनांचं सत्र दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरुस्तीसह बसच्या मेन्टेनन्स आणि खराब बसच्या वाहतुकीचा मुद्दा समोर आला आहे.

Comments
Add Comment

Airport Job Fraud : विमानतळावरील नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; परीक्षा केंद्रावर पोहोचताच झाला प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावर आकर्षक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित

Kolhapur News : कोल्हापूरच्या विकासाला मोठी चालना; 1850 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांना मोठी चालना मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)

Pune Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ , संमतीपत्र न दिल्यास सक्तीने संपादन

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या

Baramati Plane Accident : बारामतीमध्ये सात महिन्यांत तिसरा विमान अपघात, प्रशिक्षण विमानानं धावपट्टी सोडली आणि झाला अपघात

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत यंदाच्या वर्षातला तिसरा विमान अपघात झाला आहे. ताजी घटना आज म्हणजेच रविवार ९

Pune Pub Raid : पहाटे ३ वाजेपर्यंत पार्टी रंगणाऱ्या पबवर पोलिसांची धाड! ८० ते १०० तरुण-तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पब आणि क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. विमानतळ

Sindhudurg : प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी AI वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा, जाणून घ्या कसा केला AI चा वापर ?

मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या