Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले 'कमळ'

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम केलं आहे. नुकत्याच भोर येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अखेर संग्राम थोपटे यांनी आज (दि २२) कमळ हातात घेऊन भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.



भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज (दि २२) त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खा. धनंजय महाडिक, माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत, आ. राहुल कुल, आ. योगेश टिळेकर, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.





यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाला संग्राम थोपटेसारखा कोहीनूर हिरा लाभला आहे अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांचे पक्षात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत, विकसित महाराष्ट्र संकल्पाला साथ देण्यासाठी थोपटे यांनी प्रवेश केल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे मंत्रीपद अनेक वर्षे भूषवलेल्या अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम हे भोर चे तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि अनुभव यामुळे भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचून पुणे जिल्ह्यात भाजपाला बळ मिळेल असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.


दरम्यान, या निर्णयाने संग्राम थोपटे यांच्या निर्णयानंतर पुण्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे