रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे त्यांच्या उपस्थितीत आज मालगुंड हे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, कोकणाने महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले, तेवढे कोणत्याच प्रांताने दिले नाहीत. कोकण आणि रत्नागिरी साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले, तर ती खऱ्या अर्थाने केशवसुतांना श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांचे गाव उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात मालगुंडमधील ३०, तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश करण्यात आला आहे. या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत. त्यापैकी दोन दालनांचे आज प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झाले. या दालनांमध्ये पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येणार असून, त्यांच्या आदरातिथ्यातून संबंधित कुटुंबांच्या अर्थार्जनालाही हातभार लागणार आहे.
मालगुंड हे कवितेचे गाव झाल्यामुळे ते जगाच्या नकाशावर येणार आहे, अशी प्रातिनिधिक भावना यावेळी मान्यवरांकडून व्यक्त झाली.
कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकणसाहित्य सन्मान दालनाचे उद्घाटनही या वेळी झाले. समारंभाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कवी अरुण म्हात्रे, नाटककार गंगाराम गवाणकर, मराठी भाषा विकास संस्थेचे डॉ. श्यामकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…