Nagpur Temprature Update : नागपूरकर उष्णतेत होरपळतायत!

  73

नागपूर : भारतात सगळीकडेच उष्णतेची लाट पसरली असून हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील अनेक भागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र महाराष्ट्रातील नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान असल्याचे म्हटले जात आहे.




जानेवारी महिना ओसरला की उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागते. कडाक्याच्या उन्हात अनेकांची प्रकृती देखील खालावते आहे. महाराष्ट्रात सगळीकडेच उन्हाचा प्रहार होत आहे तुलनेने जास्त तापमान नागपूरमध्ये नोंदवल गेल आहे. आजपासून येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे. तर पुणे, सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.



तुमच्या जिल्ह्यातील तापमान जाणून घ्या :-


नागपूर – ४४.७°C
परभणी – ४३.६°C
चंद्रपूर – ४४.०°C
ब्रम्हपुरी – ४३. ६°C
वर्धा – ४३.०°C
गोंदिया – ४४.०°C
अमरावती –४३.८°C
यवतमाळ – ४२. ५°C
वाशीम – ४१ . ८°C
अकोला – ४३.५°C
बुलढाणा – ४०.०°C
औरंगाबाद – ४१.७°C
जळगाव – ४१.७°C
लातूर – ४१.२°C
बीड – ४२.६°C
हिंगोली – ४२.१°C
पुणे – ३९.४°C
नाशिक – ३७.३°C
सातारा – ३९.७°C
सांगली – ३७.१°C
मुंबई उपनगर – ३३.०°C
मुंबई शहर – ३३.४°C
ठाणे – ३६.०°C
पालघर – ३५.२°C
रत्नागिरी – ३२.९°C
सिंधुदुर्ग – ३२.०°C

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या