Nagpur Temprature Update : नागपूरकर उष्णतेत होरपळतायत!

  60

नागपूर : भारतात सगळीकडेच उष्णतेची लाट पसरली असून हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील अनेक भागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र महाराष्ट्रातील नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान असल्याचे म्हटले जात आहे.




जानेवारी महिना ओसरला की उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागते. कडाक्याच्या उन्हात अनेकांची प्रकृती देखील खालावते आहे. महाराष्ट्रात सगळीकडेच उन्हाचा प्रहार होत आहे तुलनेने जास्त तापमान नागपूरमध्ये नोंदवल गेल आहे. आजपासून येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे. तर पुणे, सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.



तुमच्या जिल्ह्यातील तापमान जाणून घ्या :-


नागपूर – ४४.७°C
परभणी – ४३.६°C
चंद्रपूर – ४४.०°C
ब्रम्हपुरी – ४३. ६°C
वर्धा – ४३.०°C
गोंदिया – ४४.०°C
अमरावती –४३.८°C
यवतमाळ – ४२. ५°C
वाशीम – ४१ . ८°C
अकोला – ४३.५°C
बुलढाणा – ४०.०°C
औरंगाबाद – ४१.७°C
जळगाव – ४१.७°C
लातूर – ४१.२°C
बीड – ४२.६°C
हिंगोली – ४२.१°C
पुणे – ३९.४°C
नाशिक – ३७.३°C
सातारा – ३९.७°C
सांगली – ३७.१°C
मुंबई उपनगर – ३३.०°C
मुंबई शहर – ३३.४°C
ठाणे – ३६.०°C
पालघर – ३५.२°C
रत्नागिरी – ३२.९°C
सिंधुदुर्ग – ३२.०°C

Comments
Add Comment

99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण