Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

  60

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण जखमी झाले असून पाच बालकांचा यात समावेश आहे. या आधीही शिवनेरीवर चार वेळा अशाप्रकारचा हल्ला मधमाशांनी पर्यटकांवर केला होता.



पुण्यातील शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सर्वदूर पसरलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी येतात. शुक्रवार, शनिवार, रविवार या जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी शिवनेरी किल्ल्यावर पर्यटन करण्यास पसंती दर्शवली. रविवारी पर्यटकांची तुलनेने जास्त गर्दी होती. या गर्दीत मोठ्यांसह लहानांचा देखील समावेश होता. रविवारी सकाळच्या सुमारास पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात १६ पर्यटक गंभीर जखमी झाले. या मध्ये पाच लहान मुलांचा देखील समावेश आहे. सकाळी मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर काही काळ शिवभक्तांना किल्ल्यावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. सकाळी झालेल्या घटनेची व्याप्ती पाहता, पुन्हा लगेच कोणावर हल्ला होऊ नये, यासाठी किल्ला दोन वाजेपर्यंत बंद करण्यात आल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले. या आधीही चार वेळा मधमाशांनी पर्यटकांवर अशाप्रकारचा हल्ला केला होता. या हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.




मधमाशांना त्रास न देताही मधमाशा हल्ला का करतात. ?


चहू बाजूंनी झाडांची दाटी असलेल्या आणि शांतता असलेल्या ठिकाणी कुठे ना कुठे मधमाशा वावरत असतात. फुलांच्या आतील रस शोषून आपल्या घरट्याची बांधणी करतात. मधमाशांना जर त्रास दिला तर त्या चवताळतात आणि आजूबाजूला असलेल्या माणसांना दंश करतात. त्यांच्या दंशाने शरीराला इजा होऊ शकते. जंगल, गडकिल्ले अशा ठिकाणी मधमाशांचा वावर जास्त प्रमाणात असतो. म्हणून गडकिल्ल्यांवर जाताना परफ्यूम, अत्तर सारखे सुगंधीत द्रव्ये अंगाला लावणे टाळा. परफ्यूम, अत्तरच्या सुवासाने मधमाशा आकर्षित होऊन दंश करतात. तसेच गडकिल्ल्यांसारख्या शांत ठिकाणी आरडाओरडा करणे टाळा, शेकोटी सदृश्य कोणतीही जाळपोळ करू नका, सिगरेट सारखे धूम्रपान टाळा. आगीच्या धुराने मधमाशा चवताळतात त्या सैरावैरा होऊन हल्ला करतात. अशा वेळी घाबरून न जाता गडकिल्ल्यांवर जाताना सोबत एक चादर जवळ ठेवा, त्याचबरोबरीने प्रथमोपचाराचे साहित्य देखील जवळ बाळगा.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना