Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

  50

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण जखमी झाले असून पाच बालकांचा यात समावेश आहे. या आधीही शिवनेरीवर चार वेळा अशाप्रकारचा हल्ला मधमाशांनी पर्यटकांवर केला होता.



पुण्यातील शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सर्वदूर पसरलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी येतात. शुक्रवार, शनिवार, रविवार या जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी शिवनेरी किल्ल्यावर पर्यटन करण्यास पसंती दर्शवली. रविवारी पर्यटकांची तुलनेने जास्त गर्दी होती. या गर्दीत मोठ्यांसह लहानांचा देखील समावेश होता. रविवारी सकाळच्या सुमारास पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात १६ पर्यटक गंभीर जखमी झाले. या मध्ये पाच लहान मुलांचा देखील समावेश आहे. सकाळी मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर काही काळ शिवभक्तांना किल्ल्यावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. सकाळी झालेल्या घटनेची व्याप्ती पाहता, पुन्हा लगेच कोणावर हल्ला होऊ नये, यासाठी किल्ला दोन वाजेपर्यंत बंद करण्यात आल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले. या आधीही चार वेळा मधमाशांनी पर्यटकांवर अशाप्रकारचा हल्ला केला होता. या हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.




मधमाशांना त्रास न देताही मधमाशा हल्ला का करतात. ?


चहू बाजूंनी झाडांची दाटी असलेल्या आणि शांतता असलेल्या ठिकाणी कुठे ना कुठे मधमाशा वावरत असतात. फुलांच्या आतील रस शोषून आपल्या घरट्याची बांधणी करतात. मधमाशांना जर त्रास दिला तर त्या चवताळतात आणि आजूबाजूला असलेल्या माणसांना दंश करतात. त्यांच्या दंशाने शरीराला इजा होऊ शकते. जंगल, गडकिल्ले अशा ठिकाणी मधमाशांचा वावर जास्त प्रमाणात असतो. म्हणून गडकिल्ल्यांवर जाताना परफ्यूम, अत्तर सारखे सुगंधीत द्रव्ये अंगाला लावणे टाळा. परफ्यूम, अत्तरच्या सुवासाने मधमाशा आकर्षित होऊन दंश करतात. तसेच गडकिल्ल्यांसारख्या शांत ठिकाणी आरडाओरडा करणे टाळा, शेकोटी सदृश्य कोणतीही जाळपोळ करू नका, सिगरेट सारखे धूम्रपान टाळा. आगीच्या धुराने मधमाशा चवताळतात त्या सैरावैरा होऊन हल्ला करतात. अशा वेळी घाबरून न जाता गडकिल्ल्यांवर जाताना सोबत एक चादर जवळ ठेवा, त्याचबरोबरीने प्रथमोपचाराचे साहित्य देखील जवळ बाळगा.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती