Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला 'हा' आजार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला आहे. या आजारात चेहऱ्याला पक्षाघाताचा झटका येतो. यामुळे चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. बोलायला त्रास होतो किंवा बोलता येत नाही. अनेकदा हा आजार मर्यादीत कालावधीपुरता त्रासदायक असतो. वेळेत उपचार केले तर या आजारातून बरे होणे शक्य आहे. अनेकदा औषधोपचाराने दोन आठवडे ते सहा महिन्यांच्या कालावधीत रुग्ण बरा होतो.





धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झाल्याचे सांगितले. उपचार सुरू आहेत पण अद्याप पूर्ण बरा झालेलो नाही, असेही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.



आमदार धनंजय मुंडे यांचा विश्वासू म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आहे. करुणा मुंडे यांच्या वक्तव्यांमुळे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचे वृत्त आले आहे.

मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे कॅमेऱ्यापुढे आलेले नाहीत. त्यांच्या आजाराविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आले. यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली. या पोस्टद्वारे धनंजय मुंडे यांनी त्यांना झालेल्या आजाराची माहिती दिली.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार