Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला 'हा' आजार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला आहे. या आजारात चेहऱ्याला पक्षाघाताचा झटका येतो. यामुळे चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. बोलायला त्रास होतो किंवा बोलता येत नाही. अनेकदा हा आजार मर्यादीत कालावधीपुरता त्रासदायक असतो. वेळेत उपचार केले तर या आजारातून बरे होणे शक्य आहे. अनेकदा औषधोपचाराने दोन आठवडे ते सहा महिन्यांच्या कालावधीत रुग्ण बरा होतो.





धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झाल्याचे सांगितले. उपचार सुरू आहेत पण अद्याप पूर्ण बरा झालेलो नाही, असेही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.



आमदार धनंजय मुंडे यांचा विश्वासू म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आहे. करुणा मुंडे यांच्या वक्तव्यांमुळे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचे वृत्त आले आहे.

मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे कॅमेऱ्यापुढे आलेले नाहीत. त्यांच्या आजाराविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आले. यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली. या पोस्टद्वारे धनंजय मुंडे यांनी त्यांना झालेल्या आजाराची माहिती दिली.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे