Solapur Neurosurgeon : सोलापूरच्या प्रसिद्ध न्युरोसर्जनची आत्महत्या

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्युरोसर्जनने आत्महत्या केली. न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली.



डॉ. शिरीष वळसंगकर यांनी त्यांच्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबियांनी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांना कुटुंबियांनी तातडीने वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर उपचार सुरू झाले. सुरुवातीला प्रकृती गंभीर असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वळसंगकर यांच्या कुटुंबियांना सांगितले. थोड्या वेळाने मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.


शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येमागचे नेमके कारण काय आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा