Solapur Neurosurgeon : सोलापूरच्या प्रसिद्ध न्युरोसर्जनची आत्महत्या

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्युरोसर्जनने आत्महत्या केली. न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली.



डॉ. शिरीष वळसंगकर यांनी त्यांच्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबियांनी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांना कुटुंबियांनी तातडीने वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर उपचार सुरू झाले. सुरुवातीला प्रकृती गंभीर असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वळसंगकर यांच्या कुटुंबियांना सांगितले. थोड्या वेळाने मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.


शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येमागचे नेमके कारण काय आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात