साईबाबांच्या चरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट; श्रद्धेची भक्तिपूर्ण देणगी

  198

दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट


शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं जीवनच पालटतं, अशा साईनाथांच्या चरणी पुन्हा एकदा एका भक्ताने भक्तीचा अनमोल नजराणा अर्पण केला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका भक्ताने तब्बल ६८ लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या मुकुटाचे वजन आहे ७८८.४४ ग्रॅम, आणि त्यावरील आकर्षक नक्षीकाम साईभक्तीच्या गहिर्या भावनांचे प्रतीक आहे.


या संदर्भात माहिती देताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, हा सुवर्ण मुकुट शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी साईचरणी अर्पण करण्यात आला. आणि या नव्या अर्पणामुळे साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.



शिर्डी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती श्रद्धेचा महासागर आहे. ज्याला कोणीही पार करू शकत नाही… इथं आलेला प्रत्येकजण आपली वेदना, आपली आशा, आपली प्रार्थना साईचरणी अर्पण करून जातो – आणि त्या बदल्यात मिळते अंतःकरणाला शांती, समाधान.


शिर्डी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान असून देश-विदेशातून कोट्यवधी भाविक इथे दररोज येतात. केवळ सुवर्ण मुकुटच नव्हे, तर सोने, चांदी, हिरे, मौल्यवान वस्तू आणि रोख स्वरूपातील देणग्यांचा वर्षाव साईबाबांच्या चरणी सातत्याने होत असतो.


अशा या अद्भुत भक्तीच्या ओढीमुळे, साईंचं मंदिर केवळ संगमरवरी चौकटीत बांधलेलं स्थान न राहता, ते लाखो लोकांच्या हृदयात खोलवर कोरलं गेलेलं श्रद्धास्थान बनलं आहे.


"साईंच्या कृपेनं सगळं मिळतं, मग आपण जे काही मिळवलं, ते त्यांच्या चरणी अर्पण केल्याशिवाय पूर्णत्व येत नाही" – ही भावना त्या भक्ताच्या देणगीतून प्रत्ययास येते.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी