साईबाबांच्या चरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट; श्रद्धेची भक्तिपूर्ण देणगी

दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट


शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं जीवनच पालटतं, अशा साईनाथांच्या चरणी पुन्हा एकदा एका भक्ताने भक्तीचा अनमोल नजराणा अर्पण केला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका भक्ताने तब्बल ६८ लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या मुकुटाचे वजन आहे ७८८.४४ ग्रॅम, आणि त्यावरील आकर्षक नक्षीकाम साईभक्तीच्या गहिर्या भावनांचे प्रतीक आहे.


या संदर्भात माहिती देताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, हा सुवर्ण मुकुट शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी साईचरणी अर्पण करण्यात आला. आणि या नव्या अर्पणामुळे साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.



शिर्डी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती श्रद्धेचा महासागर आहे. ज्याला कोणीही पार करू शकत नाही… इथं आलेला प्रत्येकजण आपली वेदना, आपली आशा, आपली प्रार्थना साईचरणी अर्पण करून जातो – आणि त्या बदल्यात मिळते अंतःकरणाला शांती, समाधान.


शिर्डी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान असून देश-विदेशातून कोट्यवधी भाविक इथे दररोज येतात. केवळ सुवर्ण मुकुटच नव्हे, तर सोने, चांदी, हिरे, मौल्यवान वस्तू आणि रोख स्वरूपातील देणग्यांचा वर्षाव साईबाबांच्या चरणी सातत्याने होत असतो.


अशा या अद्भुत भक्तीच्या ओढीमुळे, साईंचं मंदिर केवळ संगमरवरी चौकटीत बांधलेलं स्थान न राहता, ते लाखो लोकांच्या हृदयात खोलवर कोरलं गेलेलं श्रद्धास्थान बनलं आहे.


"साईंच्या कृपेनं सगळं मिळतं, मग आपण जे काही मिळवलं, ते त्यांच्या चरणी अर्पण केल्याशिवाय पूर्णत्व येत नाही" – ही भावना त्या भक्ताच्या देणगीतून प्रत्ययास येते.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर