Nashik : नाशिकमध्ये हिंसा, ३८ अटकेत; MIM च्या शहराध्यक्षाला अटक आणि मविआचे पदाधिकारी फरार

नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दर्ग्याच्या व्यवस्थापनाला कायद्यानुसार महापालिकेने नोटीस बजावली होती. पण महापालिकेने कारवाई सुरू करताच मुसलमानांनी घटनास्थळी जमून पोलिसांवर दगडफेक केली. कारवाईला विरोध करण्यासाठी दंगल करण्यात आली. पोलिसांवर हल्ले करण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या भागात दंगल झाली तिथे पोलीस बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दंगल प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारवाईला विरोध करण्यासाठी अल्पावधीत मोठा जमाव आला कसा आणि सतत हल्ले करण्यासाठी दगड आणि शस्त्रे आली कुठुन ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक केली आहे. काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.

नाशिकमधील हिंसेप्रकरणी १५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी यांचाही समावेश आहे. या आरोपींच्या विरोधात कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दर्ग्यावरील कारवाईला विरोध म्हणून पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये २१ पोलीस जखमी झाले होते. अनेक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. दंगल करणाऱ्यांनी ३० वाहनांची नासधूस केली. घातक शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात मोबाइल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Buldhana : बुलढाण्याचा अडीच वर्षांचा चिमुकला ठरला 'गुगल बॉय', फक्त २ मिनिटांत ७१ देशांच्या राजधान्या तोंडपाठ

'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये कोरले नाव बुलढाणा : ज्या वयात मुले अडखळत शब्द बोलू लागतात, त्याच वयात बुलढाणा