Nashik : नाशिकमध्ये हिंसा, ३८ अटकेत; MIM च्या शहराध्यक्षाला अटक आणि मविआचे पदाधिकारी फरार

नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दर्ग्याच्या व्यवस्थापनाला कायद्यानुसार महापालिकेने नोटीस बजावली होती. पण महापालिकेने कारवाई सुरू करताच मुसलमानांनी घटनास्थळी जमून पोलिसांवर दगडफेक केली. कारवाईला विरोध करण्यासाठी दंगल करण्यात आली. पोलिसांवर हल्ले करण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या भागात दंगल झाली तिथे पोलीस बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दंगल प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारवाईला विरोध करण्यासाठी अल्पावधीत मोठा जमाव आला कसा आणि सतत हल्ले करण्यासाठी दगड आणि शस्त्रे आली कुठुन ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक केली आहे. काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.

नाशिकमधील हिंसेप्रकरणी १५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी यांचाही समावेश आहे. या आरोपींच्या विरोधात कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दर्ग्यावरील कारवाईला विरोध म्हणून पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये २१ पोलीस जखमी झाले होते. अनेक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. दंगल करणाऱ्यांनी ३० वाहनांची नासधूस केली. घातक शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात मोबाइल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना