JEE Main 2025 Session-II : जेईई मेन सत्र २ची उत्तरंपत्रिका प्रसिद्ध!

मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. काल (दि १७) ही उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली. आता पुन्हा उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या जेईई मेन सत्र २ च्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका एनटीएने काल (दि १७) अंतिम उत्तरपत्रिका जारी केली होती परंतु नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकली, त्यानंतर विद्यार्थ्यांना असे का केले गेले? हा प्रश्न पडला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी उत्तरं पत्रिकेबाबत आक्षेप नोंदवले होते आणि एनटीएला ईमेल केला होता. त्यामुळेच एनटीएने ही उत्तरपत्रिका हटविण्यात आली होती. आज (दि १८) दुपारी २ च्या सुमारास पुंन्हा अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.





तसेच १९ एप्रिलला म्हणजेच शनिवारी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एनटीएने जाहीर केलं आहे. दरम्यान जेईई मेन सत्र २ परीक्षेसाठी बसलेले आणि उत्तरंपत्रिकेची आणि निकालाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर याबाबत माहिती तपासू शकतात.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती