Cricketer Sanjay Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीला पाठवले न्यूड फोटो

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करत आहे. संजय बांगर याचा मुलगा अनय बांगर याने काही दिवसांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. आता अनय बांगरचे रुपांतर अनाया बांगरमध्ये झाले आहे. संजय बांगरच्या या मुलीने एका मुलाखतीत बोलताना धक्कादायक आरोप केले आहेत. अनायाने क्रिकेटविश्वाची एक काळी बाजूच समोर आणली आहे.



बराच काळ लंडनमध्ये राहिल्यानंतर अनाया भारतात आली आहे. भारताच येताच तिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत एक मोठा भारतीय क्रिकेटर माझ्याशी संबंध ठेवू पाहत होता. तर काही खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवायचे. काही क्रिकेटर तर मला सर्वांसमोर शिवीगाळ करायचे. नंतर मला फोटो मागायचे, असं अनायाने सांगितलं. जेंडर चेंज केल्यानंतर माझ्या वडिलांनी मला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला. तुला क्रिकेट सोडलं पाहिजे.





आता क्रिकेटमध्ये तुझ्यासाठी काहीच जागा उरली नाही, असं वडिलांनी म्हटल्याचं अनाया म्हणते. अनाया बांगरने व्यक्त केले की, तिला याचे दुःख आहे की महिलांच्या क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सना खेळण्याची परवानगी नाही. तिची टेस्टोस्टेरॉन पातळी ही सामान्य मुलीप्रमाणेच आहे, तरीही तिला महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली जात नाही, याची खंत तिने व्यक्त केली.

Comments
Add Comment

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे