Pilot Education Update : पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं आहे का ?

  86

मुंबई : पायलट होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. पूर्वी पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं होत आता या निकषांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. DGCA च्या या निर्णयानंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेसोबत कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होण्याची संधी मिळणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकापासून देशात फक्त विज्ञान आणि गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच व्यावसायिक पायलट बनण्याची परवानगी आहे. पूर्वी, व्यावसायिक पायलट परवाना मिळविण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. मात्र आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) व्यावसायिक पायलट होण्यासाठी पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत कला आणि वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील व्यावसायिक पायलट बनू शकतील.


सध्या, व्यावसायिक पायलट होण्यासाठी, उमेदवाराला विज्ञान आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विमान उड्डाण करताना वैमानिकाला खूप गणिते करावी लागतात. वेग, वेळ आणि अंतर मोजावे लागेल. इंधनाचा वापर, नेव्हिगेशन, या सगळ्याचा गणितीय अभ्यास करणं गरजेचं असल्याने गणितातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच कमर्शियल पायलट लायसन्स कोर्समध्ये, ग्राउंड ट्रेनिंग, सिम्युलेटर ट्रेनिंग आणि फ्लाइंग ट्रेनिंगचा सिद्धांत शिकवला जातो. याशिवाय, प्रॅक्टिकल देखील केले जाते. ग्राउंड ट्रेनिंगमध्ये विमान वाहतुकीची तत्त्वे, नियम आणि कायदे शिकवले जातात. तर सिम्युलेटर प्रशिक्षणात, प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव न घेता विमानाच्या विविध पैलूंची समज आणि प्रशिक्षण दिले जाते. उड्डाण प्रशिक्षणामुळे खऱ्या विमानात उड्डाण करण्याचा अनुभव मिळतो आणि विमान कसे नियंत्रित करायचे ते शिकवले जाते.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही