Pilot Education Update : पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं आहे का ?

मुंबई : पायलट होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. पूर्वी पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं होत आता या निकषांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. DGCA च्या या निर्णयानंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेसोबत कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होण्याची संधी मिळणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकापासून देशात फक्त विज्ञान आणि गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच व्यावसायिक पायलट बनण्याची परवानगी आहे. पूर्वी, व्यावसायिक पायलट परवाना मिळविण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. मात्र आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) व्यावसायिक पायलट होण्यासाठी पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत कला आणि वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील व्यावसायिक पायलट बनू शकतील.


सध्या, व्यावसायिक पायलट होण्यासाठी, उमेदवाराला विज्ञान आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विमान उड्डाण करताना वैमानिकाला खूप गणिते करावी लागतात. वेग, वेळ आणि अंतर मोजावे लागेल. इंधनाचा वापर, नेव्हिगेशन, या सगळ्याचा गणितीय अभ्यास करणं गरजेचं असल्याने गणितातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच कमर्शियल पायलट लायसन्स कोर्समध्ये, ग्राउंड ट्रेनिंग, सिम्युलेटर ट्रेनिंग आणि फ्लाइंग ट्रेनिंगचा सिद्धांत शिकवला जातो. याशिवाय, प्रॅक्टिकल देखील केले जाते. ग्राउंड ट्रेनिंगमध्ये विमान वाहतुकीची तत्त्वे, नियम आणि कायदे शिकवले जातात. तर सिम्युलेटर प्रशिक्षणात, प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव न घेता विमानाच्या विविध पैलूंची समज आणि प्रशिक्षण दिले जाते. उड्डाण प्रशिक्षणामुळे खऱ्या विमानात उड्डाण करण्याचा अनुभव मिळतो आणि विमान कसे नियंत्रित करायचे ते शिकवले जाते.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.