Pilot Education Update : पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं आहे का ?

मुंबई : पायलट होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. पूर्वी पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं होत आता या निकषांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. DGCA च्या या निर्णयानंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेसोबत कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होण्याची संधी मिळणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकापासून देशात फक्त विज्ञान आणि गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच व्यावसायिक पायलट बनण्याची परवानगी आहे. पूर्वी, व्यावसायिक पायलट परवाना मिळविण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. मात्र आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) व्यावसायिक पायलट होण्यासाठी पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत कला आणि वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील व्यावसायिक पायलट बनू शकतील.


सध्या, व्यावसायिक पायलट होण्यासाठी, उमेदवाराला विज्ञान आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विमान उड्डाण करताना वैमानिकाला खूप गणिते करावी लागतात. वेग, वेळ आणि अंतर मोजावे लागेल. इंधनाचा वापर, नेव्हिगेशन, या सगळ्याचा गणितीय अभ्यास करणं गरजेचं असल्याने गणितातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच कमर्शियल पायलट लायसन्स कोर्समध्ये, ग्राउंड ट्रेनिंग, सिम्युलेटर ट्रेनिंग आणि फ्लाइंग ट्रेनिंगचा सिद्धांत शिकवला जातो. याशिवाय, प्रॅक्टिकल देखील केले जाते. ग्राउंड ट्रेनिंगमध्ये विमान वाहतुकीची तत्त्वे, नियम आणि कायदे शिकवले जातात. तर सिम्युलेटर प्रशिक्षणात, प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव न घेता विमानाच्या विविध पैलूंची समज आणि प्रशिक्षण दिले जाते. उड्डाण प्रशिक्षणामुळे खऱ्या विमानात उड्डाण करण्याचा अनुभव मिळतो आणि विमान कसे नियंत्रित करायचे ते शिकवले जाते.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता