Pilot Education Update : पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं आहे का ?

मुंबई : पायलट होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. पूर्वी पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं होत आता या निकषांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. DGCA च्या या निर्णयानंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेसोबत कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होण्याची संधी मिळणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकापासून देशात फक्त विज्ञान आणि गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच व्यावसायिक पायलट बनण्याची परवानगी आहे. पूर्वी, व्यावसायिक पायलट परवाना मिळविण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. मात्र आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) व्यावसायिक पायलट होण्यासाठी पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत कला आणि वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील व्यावसायिक पायलट बनू शकतील.


सध्या, व्यावसायिक पायलट होण्यासाठी, उमेदवाराला विज्ञान आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विमान उड्डाण करताना वैमानिकाला खूप गणिते करावी लागतात. वेग, वेळ आणि अंतर मोजावे लागेल. इंधनाचा वापर, नेव्हिगेशन, या सगळ्याचा गणितीय अभ्यास करणं गरजेचं असल्याने गणितातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच कमर्शियल पायलट लायसन्स कोर्समध्ये, ग्राउंड ट्रेनिंग, सिम्युलेटर ट्रेनिंग आणि फ्लाइंग ट्रेनिंगचा सिद्धांत शिकवला जातो. याशिवाय, प्रॅक्टिकल देखील केले जाते. ग्राउंड ट्रेनिंगमध्ये विमान वाहतुकीची तत्त्वे, नियम आणि कायदे शिकवले जातात. तर सिम्युलेटर प्रशिक्षणात, प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव न घेता विमानाच्या विविध पैलूंची समज आणि प्रशिक्षण दिले जाते. उड्डाण प्रशिक्षणामुळे खऱ्या विमानात उड्डाण करण्याचा अनुभव मिळतो आणि विमान कसे नियंत्रित करायचे ते शिकवले जाते.

Comments
Add Comment

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

मुंबईतील २९५ बेकरींवर महापालिकेचा 'प्रहार'; बेकरींना 'पीएनजी-एलपीजी' किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरणे बंधनकारक

मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या

मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना