Dhanshree Verma : युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

  80

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं अखेर गेल्या महिन्यात २० मार्च रोजी संपुष्टात आले.घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. धनश्री उत्तम नृत्यांगणा आहे आणि तिच्या नृत्याचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नृत्यांगणा असण्याबरोबरच धनश्री एक अभिनेत्री आहे आणि लवकरच ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. याबद्दल धनश्रीने स्वत:च माहिती दिली आहे.



धनश्रीने स्वतः तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत पहिला चित्रपट येणार असल्याचे म्हटलं आहे. धनश्री बऱ्याच दिवसांपासून हैदराबादमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. याच चित्रीकरणाचे आणि टीमचे काही खास क्षण तिने पोस्टद्वारे शेअर केले आहेत. ती ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. दरम्यान, धनश्रीच्या या पोस्टमधून तिच्या चित्रपटाचे किंवा भूनिकेचे नाव जाहीर झालेलं नाही. त्यामुळे अनेकांनी तिच्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाच्या नावाविषयीजी उत्सुकता व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या आधी धनश्रीचं एक गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. 'देखा जी देखा मैंने' असं या गाण्याचं नाव असून घटस्फोटाच्या सुनावणी दिवशीच हे गाणं प्रदर्शित झालं होतं.


धनश्री व चहल यांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, मोठ्या थाटामाटात डिसेंबर २०२० मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघं सतत एकत्र दिसायचे. त्याचबरोबर सोशल मीडियावर एकत्र रील व्हिडीओ शेअर करायचे. पण २०२३ मध्ये धनश्री-चहलच्या नात्यात तेढ निर्माण होतं असल्याचं समोर आलं. दोघं विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. आणि अखेर २० मार्च २०२५ रोजी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब