भिवंडी : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात भिवंडी शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम कंपनीची मुख्य जलवहिनी तुटल्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे भिवंडीत पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील नागरिकांना सुचना देण्यात येत आहे की भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम कंपनीची मुख्य जलवहिनी कल्याण सापड गाव येथे तुटल्याने भिवंडी शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नागरिकांना शनिवार (दि. १८) व रविवार (दि.१९) असे २४ तास पाणी पुरवठा होणार नाही.
दरम्यान, पाईप लाईन दुरुस्त झाल्यावर भिवंडी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे,कार्यकारी अभियंता,भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…