Bhiwandi Water Supply : नागरिकांनो पाणी जपून वापरा! भिवंडीत पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद

भिवंडी : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात भिवंडी शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम कंपनीची मुख्य जलवहिनी तुटल्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे भिवंडीत पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील नागरिकांना सुचना देण्यात येत आहे की भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम कंपनीची मुख्य जलवहिनी कल्याण सापड गाव येथे तुटल्याने भिवंडी शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नागरिकांना शनिवार (दि. १८) व रविवार (दि.१९) असे २४ तास पाणी पुरवठा होणार नाही.



दरम्यान, पाईप लाईन दुरुस्त झाल्यावर भिवंडी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे,कार्यकारी अभियंता,भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास