बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

नवी मुंबई : उन्हाचा वाढता जोर आणि त्यात वातावरणात अचानक बदल यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक दिसून येत आहे. उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.


उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचंड उष्मा सुरू झाला असून, अंगाची लाही लाही होत आहे. कधी सकाळी थंड वातावरण, तर मध्येच सकाळपासूनच उष्मा जाणवत आहे. यामुळे नागरिक आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरोघरी दुपारच्या सुमारास पंख्यांचा जोर वाढला आहे, तर वातानुकूलित यंत्रणेचा वापर सर्वाधिक करण्यात येत आहे. दिवसेंदिवस गर्मी वाढत जात असल्याने उष्माघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, उन्हामध्ये फिरू नये, तापमानाच्या ठिकाणी काम करणे टाळावे, बर्फाचे पदार्थ खाणे टाळावेत, पाणी पिताना ते स्वच्छ आहे का? याची खात्री करावी, धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे. उन्हाळ्यात पाणी दूषित होण्याचा अधिका धोका असतो, त्यामुळे पाणी पिताना काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे, असा सला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
शिवाय वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या गर्दीत वाढ होऊ लागली आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात