शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख कूचकामी; ठाकरे शिवसैनिकांचा आरोप

  281

उबाठा शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी


माणगांव : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता प्रत्येक राजकिय पक्षाने मोर्चेबांधणी केली आहे. अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत आहेत. दक्षिण रायगड शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख पद बदलुन सुमारे ३ महिने झाले आहेत. परंतु, जिल्हा नेतृत्वाला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामीण भागातील शिवसैनिक ओळखत देखिल नसल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अधोगती लागल्याचे चित्र दक्षिण रायगड मध्ये दिसत आहे.


जिल्हा नेतृत्व शिवसैनिकांना मान्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून उबाठा गटातील अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. आणि याचा फायदा सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट), भाजपा, राष्ट्रवादी (अप) यांना मिळत आहे.



येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत, ग्रामपंचायती निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर या पक्षांतराने फरक पडणार, असा रायगड जिल्ह्यातील राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.


लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जाऊन सुद्धा ठाकरे शिवसैनिक पक्षात ठाम होता. परंतु, जिल्हा नेतृत्वात बदल करण्यात आल्यावर मोठ्या प्रमाणावर पक्षाला हानी होत असल्याने दिसून येत आहे, असे मत रायगड जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत


जिल्हाप्रमुख हे कणखर व कुशल व संघटना बांधणी करण्यात असमर्थ ठरत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. प्रचंड नाराजी या निवडीवर शिवसैनिकांची व पदाधिकाऱ्यांची असल्याने पक्षात समन्वयक दिसून येत नाही.


जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा नेतृत्व बदलण्याची गरज आज ठाकरे शिवसेनेला गरज भासत आहे. जिल्हा नेतृत्व असेच राहिले तर ठाकरेंची शिवसेना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ४ क्रमांकावरच नव्हे तळा-गाळात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे देखील बोलण्यात येत आहे.


जिल्ह्यातील पक्षांतर जिल्हा नेतृत्व थांबवू शकत नाही व त्यांना कोणीही जुमानत नाही हे यावरून दिसत असल्याने दक्षिण रायगड मधील ठाकरेंची शिवसेना व पदाधिकारी पर्याय शोधत आहेत हे वास्तवशाली सत्य आहे, असे मत रायगड जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त