पुणे : पुणे – सातारा महामार्गावर व्होल्व्हो एसी बसला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली. आग लागल्यामुळे बस जळून खाक झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रखरखत्या सकाळच्या उन्हात आज (दि १७) पुणे – सातारा महामार्गावर व्होल्व्हो एसी बसने अचानक पेट घेतला. या बसमधून २० -२५ प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आपले प्राण वाचवण्यासाठी बसमधून बाहेर उड्या मारल्या. या घटनेत काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. आग लागताच मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.
स्थानिक नागरिकांनी आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन दलास माहिती दिली. मात्र, आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाची गाडी येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली. प्राथमिक माहितीनुसार ही आग वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे वाहन तापल्यामुळे लागली आहे. दरम्यान या दुर्घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…
मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…
रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…