प्रहार    

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

  130

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.

एमपीएससीने गुरुवारच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता मुख्य परीक्षा २६, २७ आणि २८ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जवळपास साडे सात हजार उमेदवार बसले होते. उमेदवार गेले दोन दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. अखेर एमपीएससीने नव्या तारख्या जाहीर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या ३१८ उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या पूर्व तयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे २६ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाले आहेत. उमेदवाराकडून प्राप्त निवेदन तसेच इतर बाबींचा विचार करून प्रस्तुत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ सुधारित वेळापत्रकानुसार २७, २८, २९ मे या कालावधीत घेण्यात येईल.

Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे