नियतीपर्यंतचा प्रवास

  24

सद्गुरू वामनराव पै


परमेश्वराचे स्थान आपल्या जीवनात प्रचंड आहे व परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरते असा सिद्धांत जीवनविद्येने सिद्धांत मांडलेला आहे. परमेश्वर आहे कसा, तो काय करतो, तो आहे कुठे या अशा गोष्टींचा उहापोह केला, तर आपल्याला असे आढळून येईल की, परमेश्वरबद्दल कितीही बोललो तरी कमीच. मला तर परमेश्वर हा विषय इतका आवडतो की, या विषयावरच बोलत राहावे असे वाटते. मी लोकांना नेहमी सांगतो परमेश्वरावर प्रेम करा, मनापासून प्रेम करा. आता परमेश्वरावर प्रेम कसे करायचे हा प्रश्न लोकांना पडतो. तो डोळ्यांना दिसत नाही, तर त्याच्यावर प्रेम कसे करणार ? त्यासाठी आई, वडील, गुरू, सद्गुरू, पती, पत्नी, यांपैकी कुणावरही तुम्ही प्रेम करू शकता. कुठे तरी एका ठिकाणी त्याला पाहायला शिका. सर्व ठिकाणी त्याला पाहणे कठीण जाते. दिसेल तो परमेश्वर. दिसेल तो परमेश्वर ही वस्तुस्थिती आहे, पण ते सतत पाहणे कठीण आहे. कुठे तरी एका ठिकाणी पाहायचे तर सद्गुरूंच्या ठिकाणी पाहणे जास्त चांगले, कारण सद्गुरू जे देतात ते इतर देत नाहीत. सद्गुरू जे काही देतात ते इतर देत नाहीत, सद्गुरू आपल्याला किती महत्त्वाचे काय देतात ते कळायलाही अक्कल लागते. सद्गुरू देवापेक्षाही श्रेष्ठ का तर सद्गुरू देव देतात म्हणून. देतात म्हणजे दाखवितात, त्याचा अनुभव देतात.


हे मी सांगतो आहे कारण, परमेश्वर हा विषय आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे व तो समजावून घेतलाच पाहिजे. हा विषय जर समजावून घेतला नाही, तर पुरातन काळापासून आजतागायत जे चाललेले आहे ते तसेच चालत राहणार. आपण जर विचार केला, तर आपल्याला असे दिसून येईल की, दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चाललेली आहे आणि ते सुद्धा देवाधर्माच्या नावाखाली हे विशेष. जीवनविद्या सांगते तुम्हाला जर देवच कळलेला नाही, तर तुमची धर्माची संकल्पना चुकते आणि धर्माची संकल्पना चुकली, तर संस्कृती ही विकृती होते. संस्कृती विकृती झाली की, तुमच्याकडून जे घडते ते पाप. हे पाप फळाला आले की, असते ती अशुभ नियती व पुण्य फळाला आले की, असते ती शुभ नियती. ही नियती आपण भोगत असतो त्यालाच सुखदुःख म्हणतात. या सुखदुःखाला लोक नशीब असे म्हणतात. असा हा सगळा
प्रवास आहे.

Comments
Add Comment

ब्रह्मर्षी वशिष्ठ

भारतीय ऋषी: डॉ. अनुराधा कुलकर्णी शरद पौर्णिमेची रात्र होती. सरस्वती नदीकाठचा निसर्गरम्य प्रदेश शुभ्र चांदण्यात

जन्माष्टमीनंतर 'या' ३ राशींचे नशीब चमकणार! १७ ऑगस्टपासून सुरू होणार सुवर्णकाळ

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. जन्माष्टमीनंतर १७ ऑगस्ट

आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, पाहा कधी आहे चंद्रोदय

मुंबई: आज मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी

ऑगस्टचा नवा आठवडा आजपासून सुरू, या ४ राशींना होऊ शकतो अचानक धनलाभ

मुंबई : ११ ऑगस्टपासून नवा आठवडा सुरू होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हिशेबाने हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

यंदाच्या रक्षाबंधनाला या राशींच्या नशिबाचे कुलूप उघडणार...पाहा तुमची रास यात आहे का?

मुंबई: यंदाच्या वर्षी रक्षाबंधन ९ ऑगस्ट, शनिवारी साजरा केला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाचे रक्षाबंधन खूप

रक्षाबंधन २०२५: सूर्य-शनी युतीमुळे 'या' ५ राशींना मिळेल विशेष लाभ!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. २०२५ मध्ये रक्षाबंधनाच्या