Cash On Wheels : पंचवटी एक्सप्रेस एटीएम असलेली भारतातील पहिली ट्रेन!

मुंबई : ट्रेनमध्ये बसून तुम्ही एटीएममधून रोख रक्कम काढू शकता, हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? पण ही आता कल्पना नाही – हे आहे सत्य! होय, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस भारतातील पहिली ट्रेन बनलीये जिथं बसवण्यात आलंय ‘एटीएम ऑन व्हील्स!’ नक्की काय आहे रेल्वेचा नवा उपक्रम, चला जाणून घेऊ या अधिक माहितीविषयी...


भारतीय रेल्वेच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाअंतर्गत भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने हा एटीएमचा पहिला प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला आहे. हे एटीएम ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसवण्यात आलंय, पण त्याचा उपयोग संपूर्ण २२ डब्यांमधील प्रवासी करू शकतात – कारण सगळे डबे वेस्टिब्यूलने जोडलेत. हे सगळे ठिक आहे पण एटीएम ट्रेनमध्ये चालत असताना काम करतंय का? तर हो!



चाचणीदरम्यान संपूर्ण प्रवासात हे मशीन सुरळीतपणे कार्यरत होतं. फक्त इगतपुरी ते कसारा दरम्यानच्या बोगद्यांमध्ये थोड्याशा नेटवर्क अडचणी होत्या, पण त्या अपवाद ठरल्या. या एटीएमचा वापर फक्त रोख रक्कम काढण्यासाठीच नाही, तर चेकबुक ऑर्डर, अकाउंट स्टेटमेंट मिळवणं यासाठीही करता येतो. आणि विशेष म्हणजे हाच एटीएम मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस मध्येही प्रवाशांसाठी उपलब्ध असेल!



सुरक्षिततेचीही पूर्ण खबरदारी घेतली असून एटीएममध्ये शटर सिस्टीम आहे आणि २४ तास CCTV कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जाते. भविष्यात ही सुविधा प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली, तर ही योजना इतर गाड्यांमध्येही वाढवली जाणार आहे! त्यामुळे भारताच्या रेल्वेचा प्रवास आता केवळ मंजिलपर्यंत नाही, तर आधुनिकतेकडेही सुरू झालाय! कॅश ऑन व्हील्स हे फक्त नाव नाही, ही आहे भारतीय रेल्वेची एक क्रांती! आणि ही क्रांती सुरू झालेय आपल्या लाडक्या पंचवटी एक्सप्रेसपासून!

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री