Cash On Wheels : पंचवटी एक्सप्रेस एटीएम असलेली भारतातील पहिली ट्रेन!

मुंबई : ट्रेनमध्ये बसून तुम्ही एटीएममधून रोख रक्कम काढू शकता, हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? पण ही आता कल्पना नाही – हे आहे सत्य! होय, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस भारतातील पहिली ट्रेन बनलीये जिथं बसवण्यात आलंय ‘एटीएम ऑन व्हील्स!’ नक्की काय आहे रेल्वेचा नवा उपक्रम, चला जाणून घेऊ या अधिक माहितीविषयी...


भारतीय रेल्वेच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाअंतर्गत भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने हा एटीएमचा पहिला प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला आहे. हे एटीएम ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसवण्यात आलंय, पण त्याचा उपयोग संपूर्ण २२ डब्यांमधील प्रवासी करू शकतात – कारण सगळे डबे वेस्टिब्यूलने जोडलेत. हे सगळे ठिक आहे पण एटीएम ट्रेनमध्ये चालत असताना काम करतंय का? तर हो!



चाचणीदरम्यान संपूर्ण प्रवासात हे मशीन सुरळीतपणे कार्यरत होतं. फक्त इगतपुरी ते कसारा दरम्यानच्या बोगद्यांमध्ये थोड्याशा नेटवर्क अडचणी होत्या, पण त्या अपवाद ठरल्या. या एटीएमचा वापर फक्त रोख रक्कम काढण्यासाठीच नाही, तर चेकबुक ऑर्डर, अकाउंट स्टेटमेंट मिळवणं यासाठीही करता येतो. आणि विशेष म्हणजे हाच एटीएम मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस मध्येही प्रवाशांसाठी उपलब्ध असेल!



सुरक्षिततेचीही पूर्ण खबरदारी घेतली असून एटीएममध्ये शटर सिस्टीम आहे आणि २४ तास CCTV कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जाते. भविष्यात ही सुविधा प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली, तर ही योजना इतर गाड्यांमध्येही वाढवली जाणार आहे! त्यामुळे भारताच्या रेल्वेचा प्रवास आता केवळ मंजिलपर्यंत नाही, तर आधुनिकतेकडेही सुरू झालाय! कॅश ऑन व्हील्स हे फक्त नाव नाही, ही आहे भारतीय रेल्वेची एक क्रांती! आणि ही क्रांती सुरू झालेय आपल्या लाडक्या पंचवटी एक्सप्रेसपासून!

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य