Cabinet expansion : माजी आयपीएस के. अण्णामलाई मंत्री होणार ? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

नवी दिल्ली : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच तामीळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष आणि माजी आयपीएस के. अण्णामलाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची उच्चस्तरिय बैठक झाली. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर वरिष्ठ नेते चर्चेसाठी उपस्थित होते. ही बैठक बराच काळ चालली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. देशासमोरचे प्रश्न, पक्षापुढील आव्हाने, कोणत्या समस्येला सोडवण्यासाठी कोणती व्यक्ती सक्षम आहे अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली. चर्चेची जास्त माहिती बाहेर आलेली नाही. पण एरवी बुधवारी होत असलेली मंत्रिमंडळाची बैठक अचानक रद्द झाली. यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे.



तामीळनाडू आणि बिहार या दोन राज्यांशी संबंधित निवडक नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच विशेष कामगिरी न केलेल्या काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याचीही शक्यता आहे. वर्षभरात तामीळनाडू आणि बिहार या दोन मोठ्या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना या मुद्याचा हमखास विचार होईल, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच