Cabinet expansion : माजी आयपीएस के. अण्णामलाई मंत्री होणार ? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

नवी दिल्ली : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच तामीळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष आणि माजी आयपीएस के. अण्णामलाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची उच्चस्तरिय बैठक झाली. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर वरिष्ठ नेते चर्चेसाठी उपस्थित होते. ही बैठक बराच काळ चालली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. देशासमोरचे प्रश्न, पक्षापुढील आव्हाने, कोणत्या समस्येला सोडवण्यासाठी कोणती व्यक्ती सक्षम आहे अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली. चर्चेची जास्त माहिती बाहेर आलेली नाही. पण एरवी बुधवारी होत असलेली मंत्रिमंडळाची बैठक अचानक रद्द झाली. यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे.



तामीळनाडू आणि बिहार या दोन राज्यांशी संबंधित निवडक नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच विशेष कामगिरी न केलेल्या काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याचीही शक्यता आहे. वर्षभरात तामीळनाडू आणि बिहार या दोन मोठ्या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना या मुद्याचा हमखास विचार होईल, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना