जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात २ वर्षीय चिमुकली ठार..!

Share

जळगाव : यावल तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. बिबट्याने एका २ वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन लचके तोडल्याने संपूर्ण यावल तालुक्यात शेतकरी वर्गात, नागरिकांमध्ये, शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील ही सलग दुसरी घटना असून वनविभागाने उपाययोजना करून सुद्धा बिबट्या काही हाती लागत नाहीय.

गुरुवार १७ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारामध्ये असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात असलेल्या ठेलारी समाजातील मेंढपाळाच्या २ वर्षांच्या मुलीला बिबट्या पकडून घेऊन गेला असल्याचा संशय नातेवाईकांचा आहे. आणि सदरील लहान मुलीचा मृतदेह जवळील शिवारात सापडलेला असून लहान मुलीचे लचके तोडून तुकडे केलेले दिसून आले आहे. या घटनेची माहिती सर्वात प्रथम महसूल विभागाला मिळाल्याने त्यांनी वन विभागाला सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

घटनास्थळी यावल तहसीलदार आणि यावल वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले असून पुढील कार्यवाही सुरू केल्याची माहिती मिळाली. यावल पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात बिबट्या व वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणापासून काय काय उपाययोजना कराव्यात आणि कोणत्या प्रकारे दखल घ्यावी. याबाबत मात्र वन विभाग पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न करीत नसल्याने शेतकरी वर्गात सुद्धा शेतीची कामे करताना मोठ्या प्रमाणात भीती आणि दहशत निर्माण झाली आहे.

अनेक शेतकरी आणि मजूर शेतात जाण्यासाठी नकार देत असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. या बिबट्यामुळे परिसरामध्ये प्राण्यांची दहशत निर्माण झालेली आहे. यासाठी तातडीने वरिष्ठ पातळीवरून एक्सपर्ट मागवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संपूर्ण स्तरावरून होत आहे.

Recent Posts

Best Bus : ‘बेस्ट’ बस का पडतेय आजारी ?

मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत…

16 minutes ago

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…

1 hour ago

Electric Vehicles : महाराष्ट्र दिनापासून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

मुंबई  : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…

1 hour ago

वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…

1 hour ago

Mumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…

1 hour ago

MP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…

1 hour ago