Pune News : पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या!

पुणे : पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे या पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे. कामानिमित्त पाटणा येथे गेलेल्या लक्ष्मण शिंदे यांचा १४ एप्रिल रोजी बिहारमध्ये मृतदेह आढळून आला.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या लक्ष्मण साधू शिंदे यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. ते पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक होते. सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामासाठी मेल करत त्यांना पाटण्यात बोलवून घेतले. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा मेल आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना पाठवला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल असा विचार करुन शिंदे बिहारला गेले होते. त्यानंतर एअरपोर्टवरून त्यांचे अपरहण करण्याता आले. अपरहणानंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चोरटयांनी त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.


आरोपींनी शिंदे यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झुंकी आणि मानपूर गावादरम्यान येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून दिला. मृतदेह फेकल्यानंतर आरोपी फरार झाले. पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. सोमवारी (दि १४) पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडला. बिहारच्या स्पेशल टीमने याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने पाच संशयितांना जहानाबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये