Pune News : पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या!

  84

पुणे : पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे या पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे. कामानिमित्त पाटणा येथे गेलेल्या लक्ष्मण शिंदे यांचा १४ एप्रिल रोजी बिहारमध्ये मृतदेह आढळून आला.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या लक्ष्मण साधू शिंदे यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. ते पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक होते. सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामासाठी मेल करत त्यांना पाटण्यात बोलवून घेतले. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा मेल आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना पाठवला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल असा विचार करुन शिंदे बिहारला गेले होते. त्यानंतर एअरपोर्टवरून त्यांचे अपरहण करण्याता आले. अपरहणानंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चोरटयांनी त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.


आरोपींनी शिंदे यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झुंकी आणि मानपूर गावादरम्यान येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून दिला. मृतदेह फेकल्यानंतर आरोपी फरार झाले. पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. सोमवारी (दि १४) पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडला. बिहारच्या स्पेशल टीमने याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने पाच संशयितांना जहानाबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही