BMC: मुंबई महापालिकेत चक्क ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरीची संधी, वाचा संपूर्ण माहिती

मुंबई : नोकरीसाठी वयाची ठरावीक मर्यादा असते. पण मुंबई महापालिकेत चक्क ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वयाची मर्यादा ६५ ते ७० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारी-निमसरकारी कार्यालय, बँक व अन्य कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करण्यात येते.


केंद्र सरकारची ही मर्यादा ६० वर्षे इतकी आहे. पण मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ६५ ते ७० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची वयोमर्यादा ओलांडून गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरी करता येणार आहे. या भरतीमध्ये जिल्हा क्षयरोग केंद्रांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याशिवाय अन्य ३७ पदे भरली जाणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली असून त्यांना मासिक ६० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.


औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची वयोमर्यादा ६५ वर्षे असून त्यांना मासिक १७ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. टीबी हेल्थ व्हिजिटर १६ पदे भरण्यात येणार असून त्यांना मासिक वेतन १५ हजार ५०० रुपये त्याशिवाय १ हजार ५०० वाहतूक भत्ता मिळेल. वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ पदे असून त्यांना २५ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. वयोमर्यादा ६५ वर्षे ठेवण्यात आली आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ही पाच पदे असून त्यांना प्रत्येकी २० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा ६५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ हे पद भरण्यात येणार असून यासाठी ७५ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली