जळगाव : दुर्गम भागात आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

जळगाव : सातपुडा पर्वताच्या यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्या आदिवासी या वस्तीच्या भागातून धक्कादायक माहीती समोर येत आहे. या ठिकाणी एका ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटने संदर्भात यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दरम्यान महिलेचा मृत्यू सशस्पद असल्याने घातपात झाल्याची शक्यता येत आहे.


या संदर्भात विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाडऱ्या जामन्या या ठीकाणी निळकंठ कुटिया जवळ कोरडया तलाव असून, या क्षेत्रातुन वन विभागाचे कर्मचारी जात असतांना त्यांना तलावात अनोळखी अंदाजे ३० ते ४० वर्षीय माहिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसुन आला.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ दखल घेत आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, या अनोळखी महीलेचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती अधा अद्यापपर्यंत समोर आलेली नाही, प्राथमिक माहितीनुसार महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मरण पावलेल्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत, प्रथमदर्शनी महीलेचा मृत्यु संशयास्पद वाटल्याने तिचा मृतदेह हा यावलहून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपस सुरु आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या