जळगाव : दुर्गम भागात आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

जळगाव : सातपुडा पर्वताच्या यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्या आदिवासी या वस्तीच्या भागातून धक्कादायक माहीती समोर येत आहे. या ठिकाणी एका ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटने संदर्भात यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दरम्यान महिलेचा मृत्यू सशस्पद असल्याने घातपात झाल्याची शक्यता येत आहे.


या संदर्भात विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाडऱ्या जामन्या या ठीकाणी निळकंठ कुटिया जवळ कोरडया तलाव असून, या क्षेत्रातुन वन विभागाचे कर्मचारी जात असतांना त्यांना तलावात अनोळखी अंदाजे ३० ते ४० वर्षीय माहिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसुन आला.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ दखल घेत आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, या अनोळखी महीलेचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती अधा अद्यापपर्यंत समोर आलेली नाही, प्राथमिक माहितीनुसार महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मरण पावलेल्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत, प्रथमदर्शनी महीलेचा मृत्यु संशयास्पद वाटल्याने तिचा मृतदेह हा यावलहून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपस सुरु आहे.

Comments
Add Comment

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिजात भ्रष्टाचार

ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यांत सादर करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश नागपूर :

महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन पोलिस चौकी उघडलेल्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करा राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत राज्यस्तर गठीत

शिवरायांचा इतिहास दुर्लक्षित नाही; सीबीएसई अभ्यासक्रमात बदल घडवण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले: राज्यमंत्री पंकज भोईर

अभ्यासक्रमात लवकरच 'Rise of Maratha' हा महत्त्वाचा धडा जोडला जाणार नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांवरील CBSE अभ्यासक्रमातील

महायुतीमुळे आरक्षणाचा पेच सुटला, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारने आरक्षणाचा पेच सोडवला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची अनेक वर्षांपासूनची

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर: