Amravati Accident : अमरावतीत २ कार समोरासमोर धडकल्या; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

  63

दर्यापूर-मूर्तिजापूर मार्गावर पेट्रोलपंपासमोरील घटना‎


अमरावती : दर्यापूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर दोन कारची समोरा-समोरा धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे.शहेबाज खान अहमद खान (३०) रा. सोनोरी रा. मूर्तिजापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अब्दुल आबीद अ. राजीक (२७), आदीबा समर नासिर हुसेन (२४), अल्फीया अनम जिया खान (२३), रेहना परवीन अहमद खान (५०) खालीद खान सहेबाज खान (३) सर्व रा. सोनोरी, ता‌. मूर्तिजापूर अशी जखमींचे नावे आहेत. खान कुटुंबीय सोनोरी येथून दर्यापुरात लग्न सोहळ्यासाठी आले होते.



दरम्यान पनोरा नजीकच्या नायरा पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात शहेबाज खान अहमद खान यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातून तातडीने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवले आहे‌. घटनेची माहिती शहरात पसरताच नातेवाईक व नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. घटनास्थळी परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. धडक देणाऱ्या कारचा चालकही जखमी झाल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या