Amravati Accident : अमरावतीत २ कार समोरासमोर धडकल्या; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

दर्यापूर-मूर्तिजापूर मार्गावर पेट्रोलपंपासमोरील घटना‎


अमरावती : दर्यापूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर दोन कारची समोरा-समोरा धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे.शहेबाज खान अहमद खान (३०) रा. सोनोरी रा. मूर्तिजापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अब्दुल आबीद अ. राजीक (२७), आदीबा समर नासिर हुसेन (२४), अल्फीया अनम जिया खान (२३), रेहना परवीन अहमद खान (५०) खालीद खान सहेबाज खान (३) सर्व रा. सोनोरी, ता‌. मूर्तिजापूर अशी जखमींचे नावे आहेत. खान कुटुंबीय सोनोरी येथून दर्यापुरात लग्न सोहळ्यासाठी आले होते.



दरम्यान पनोरा नजीकच्या नायरा पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात शहेबाज खान अहमद खान यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातून तातडीने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवले आहे‌. घटनेची माहिती शहरात पसरताच नातेवाईक व नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. घटनास्थळी परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. धडक देणाऱ्या कारचा चालकही जखमी झाल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये