Maharashtra Weather : महाराष्ट्रासह २० राज्यांना पावसाचं सावट!

  64

वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा अलर्ट


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र नागरिकांना आता उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रासह इतर २० राज्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.



कोणत्या राज्यांवर बरसणार पावसाचा तडाखा?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील २० राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या काही भागांत गारपीटीची शक्यता आहे.


तसेच बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही जिल्ह्यांत हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आसाम, मणिपूर, मेघालयातील काही जिल्ह्यांत पाच दिवस पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.



अवकाळी पावसाच्या मागचे कारण काय?


सध्या मध्य प्रदेशापासून विदर्भासह मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मन्नाताच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच मध्यप्रदेशसह समुद्रसपाटीपासून नजीकच्या भागांमध्ये साधारण ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती झाली असून राज्याच्ाय बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा दिला आहे.
Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल