Maharashtra Weather : महाराष्ट्रासह २० राज्यांना पावसाचं सावट!

वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा अलर्ट


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र नागरिकांना आता उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रासह इतर २० राज्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.



कोणत्या राज्यांवर बरसणार पावसाचा तडाखा?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील २० राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या काही भागांत गारपीटीची शक्यता आहे.


तसेच बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही जिल्ह्यांत हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आसाम, मणिपूर, मेघालयातील काही जिल्ह्यांत पाच दिवस पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.



अवकाळी पावसाच्या मागचे कारण काय?


सध्या मध्य प्रदेशापासून विदर्भासह मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मन्नाताच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच मध्यप्रदेशसह समुद्रसपाटीपासून नजीकच्या भागांमध्ये साधारण ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती झाली असून राज्याच्ाय बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा दिला आहे.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद