'गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी धक्का स्थलांतरित करा'

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ ब्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्क्याचे (जेट्टी) काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्याला सुरुवातीपासून कुलाबावासियांनी विरोध केला असून तो दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी मागणी केली होती. आता त्याला शिवसेना (शिंदे गट) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात या प्रवासी संख्येंत आणखी वाढ होण्याचा अंदाज महाराष्ट्र सागरी मंडळाने वर्तविला होता.


ही बाब लक्षात घेत सागरी मंडळाने गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी अपोलो बंदर परिसरातील रेडिओ क्लबजवळ एक मोठा धक्का बांधण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेतला होता. तो बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला. त्यानुसार तेथे एकाचवेळी १० ठिकाणी २० बोटी उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. दरम्यान, कुलाबावासियांनी मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध दर्शवला.स्थानिक समस्यांचा विचार न करता या धक्क्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.


गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून रोज हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, त्याच परिसरातून बोटींची सततची ये-जा, प्रवाशांची गर्दी आणि धक्क्यावरील गोंधळ यामुळे परिसराचा ऐतिहासिक व पर्यावरणीय समतोल बिघडेल असे देवरा यांनी पत्रात अधोरेखित केले आहे. तसेच मुंबईतच अन्य ठिकाणी प्रवासी धक्का हलवता येईल.त्यासाठी शासनाने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

केईएम रुग्णालयात आता खिलाडूवृत्तीने होणार उपचार ; दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र , लवकरच स्वतंत्र क्रीडा विभाग करणार सुरु

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा

मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात