'गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी धक्का स्थलांतरित करा'

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ ब्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्क्याचे (जेट्टी) काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्याला सुरुवातीपासून कुलाबावासियांनी विरोध केला असून तो दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी मागणी केली होती. आता त्याला शिवसेना (शिंदे गट) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात या प्रवासी संख्येंत आणखी वाढ होण्याचा अंदाज महाराष्ट्र सागरी मंडळाने वर्तविला होता.


ही बाब लक्षात घेत सागरी मंडळाने गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी अपोलो बंदर परिसरातील रेडिओ क्लबजवळ एक मोठा धक्का बांधण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेतला होता. तो बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला. त्यानुसार तेथे एकाचवेळी १० ठिकाणी २० बोटी उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. दरम्यान, कुलाबावासियांनी मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध दर्शवला.स्थानिक समस्यांचा विचार न करता या धक्क्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.


गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून रोज हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, त्याच परिसरातून बोटींची सततची ये-जा, प्रवाशांची गर्दी आणि धक्क्यावरील गोंधळ यामुळे परिसराचा ऐतिहासिक व पर्यावरणीय समतोल बिघडेल असे देवरा यांनी पत्रात अधोरेखित केले आहे. तसेच मुंबईतच अन्य ठिकाणी प्रवासी धक्का हलवता येईल.त्यासाठी शासनाने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक