Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम किती टक्के पूर्ण झाले आहे ?

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज म्हणजे सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी साजऱ्या होत असलेल्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊ की स्मारकाचे काम कुठवर आले आहे ?



मुंबईत दादरच्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकारण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी अलिकडेच या कामाचा आढावा घेतला.



स्मारकाच्या प्रवेश प्रांगणाचे काम ८८.५ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारकातील व्याख्यानगृहाचे काम ७८.७५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच स्मारकातील ग्रंथालयाचे काम ८१ टक्के पूर्ण झाले आहे. तर स्मारकातील तर प्रदर्शन आणि प्रेक्षागृहाचे काम ६८ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारक परिसरातील पदपथ इमारतीचे काम ५२.८ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या आवारातील डबल बेसमेंट पार्किंग अर्थात वाहनतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २३० फूट उंचीच्या थर्माकोल मॉडेलचे काम पूर्ण झाले आहे. पुतळ्यासाठी १३९५ मेट्रिक टन संरचनात्मक स्टीलची खरेदी झाली आहे. पुतळ्याच्या १५५ मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन आणि उभारणी पूर्ण झाली आहे. एकूण दहा हजार ५१० चौरसमीटर पैकी ३०८ चौरसमीटर कांस्य पॅनेलिंगचे काम पूर्ण झाले आहे.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून