Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम किती टक्के पूर्ण झाले आहे ?

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज म्हणजे सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी साजऱ्या होत असलेल्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊ की स्मारकाचे काम कुठवर आले आहे ?



मुंबईत दादरच्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकारण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी अलिकडेच या कामाचा आढावा घेतला.



स्मारकाच्या प्रवेश प्रांगणाचे काम ८८.५ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारकातील व्याख्यानगृहाचे काम ७८.७५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच स्मारकातील ग्रंथालयाचे काम ८१ टक्के पूर्ण झाले आहे. तर स्मारकातील तर प्रदर्शन आणि प्रेक्षागृहाचे काम ६८ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारक परिसरातील पदपथ इमारतीचे काम ५२.८ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या आवारातील डबल बेसमेंट पार्किंग अर्थात वाहनतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २३० फूट उंचीच्या थर्माकोल मॉडेलचे काम पूर्ण झाले आहे. पुतळ्यासाठी १३९५ मेट्रिक टन संरचनात्मक स्टीलची खरेदी झाली आहे. पुतळ्याच्या १५५ मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन आणि उभारणी पूर्ण झाली आहे. एकूण दहा हजार ५१० चौरसमीटर पैकी ३०८ चौरसमीटर कांस्य पॅनेलिंगचे काम पूर्ण झाले आहे.
Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन