उद्धव गटात खैरे-दानवे वादामुळे दुफळी; दानवेंमुळे सगळे पक्ष सोडत असल्याचा खैरेंचा आरोप

ठाकरे गटात वाद विकोपाला : दानवेच काड्या करत असल्याचा खैरेंचा घणाघात


मुंबई  : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद अधिकच तीव्र होत चालले आहेत. औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पक्षातीलच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर थेट आरोप करत ठिणगी टाकली आहे. "दानवेच शिवसेनेत काड्या करत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्यामुळेच पक्ष सोडत आहेत!" असा थेट हल्लाबोल खैरेंनी केला आहे.



"दानवे मोठा झाल्यासारखा वागत आहे" – खैरेंचा घणाघात


चंद्रकात खैरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या मेळाव्याला खैरेंनी दांडी मारली होती. याविषयी विचारले असता खैरे म्हणाले की, कालच्या पक्षाच्या कार्यक्रमाबाबत मला कुणी सांगितलं नव्हतं. या मेळाव्याबाबत अंबादासनेही मला काहीही सांगितलं नाही. पत्रकार परिषदेत बोलताना खैरे म्हणाले, मी शिवसेनेत सुरुवातीपासून आहे. लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, पक्ष वाढवला. आणि आता हा अंबादास नंतर येतो आणि स्वतःला मोठा समजतो. मला पक्षाच्या कार्यक्रमाबाबत माहितीच दिली नाही गेली. मला कचरा समजताय का? मी उद्धव साहेबांकडे तक्रार करणार आहे.



"काड्या करणं मला जमत नाही, पण मला कोणी काढू शकत नाही"


खैरे यांचा रोख स्पष्ट होता. त्यांनी ठामपणे म्हटलं, "माझ्या पक्षासाठी मी काहीही करेल. मी स्वतंत्र आंदोलन उभारणार, ते माझ्या पक्षाचं आंदोलन असेल. दानवे सहभागी झाला तर ठीक, नाही तर नाही. पण हे ठाम आहे की अनेक शिवसैनिक दानवेमुळे नाराज आहेत."



दानवे यांच्या भूमिकेवर संशय – फुटीला जबाबदार?


खैरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "या माणसामुळे अनेक जुने कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. काय केलं आहे दानवे यांनी आजपर्यंत? फक्त द्वेष, मत्सर आणि काड्या!"


ठाकरे गटासाठी ही अंतर्गत फूट चिंतेची बाब ठरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे संघर्ष उघडपणे समोर येणं पक्षासाठी प्रतिकूल ठरू शकतं. आता अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर काय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०