PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल, मुस्लिमांची सहानुभूती असेल तर काँग्रेस मुस्लिमाला पक्षाचा अध्यक्ष का करत नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल


हिसार : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हरियाणातील हिसारमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत धार्मिक तुष्टीकरण, वक्फ कायदा, संविधानाचा अपमान आणि मुस्लिमांच्या नेतृत्वावरील अपुऱ्या प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी काँग्रेसवर मुस्लिमांच्या नावाने केवळ लांगूलचालन केल्याचा आरोप करत विचारलं, "जर खरोखर मुस्लिमांविषयी सहानुभूती असेल, तर काँग्रेसने आजपर्यंत कधी मुस्लिम व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी का नेमलं नाही?"



मुस्लिमांचा वापर, पण नेतृत्व नाही – मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसने नेहमीच मुस्लिमांच्या नावाने केवळ मतांसाठी राजकारण केलं, पण त्यांच्या प्रगतीसाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. वक्फ कायद्यात सुधारणा करून निवडणूक गमावू नये यासाठी संविधानाच्या तत्वांवरच घाला घातला. काँग्रेसने कट्टरपंथीयांना खूश ठेवण्यासाठी बहुसंख्य मुस्लिम समाजाचं नुकसान केलं."



वक्फ कायद्यावरून काँग्रेसवर टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "२०१३ मध्ये काँग्रेसने वक्फ कायद्यात बदल करून संविधानाच्या मूल्यांना दुखावलं. जर योग्य नियोजन केलं असतं, तर आज मुस्लिमांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करत बसावं लागलं नसतं."



डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप


“आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. पण काँग्रेसने त्यांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं, त्यांच्या विचारांना गाडण्याचा प्रयत्न केला,” असा आरोपही त्यांनी केला.



आरक्षण, UCC, आणि संविधानाचं राजकारण


मोदींनी काँग्रेसवर संविधानाचा वापर सत्तेसाठी हत्यार म्हणून केल्याचा आरोप करत सांगितलं की, "काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं, एससी/एसटी/ओबीसींना न्याय मिळाला की नाही हे तपासण्याचीही कधी गरज वाटली नाही. उलट कर्नाटकमध्ये त्यांच्या सरकारने धार्मिक आरक्षण देऊन संविधानाची भावना पायदळी तुडवली."


त्याचप्रमाणे, "उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला असताना काँग्रेसने त्यालाही विरोध केला. संविधान प्रत्येक नागरिकासाठी समान कायद्याची ग्वाही देतो, पण काँग्रेसने तो निवडणुकीसाठी मोडला," असा आरोपही त्यांनी केला.



उड्डाण सेवा आणि विकासाचे वचन


या कार्यक्रमात त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करत, “चप्पल घातलेला सामान्य माणूसही आता विमान प्रवास करेल,” असे सांगितले. २०१४ पूर्वी केवळ ७४ विमानतळ होते, आता ती संख्या १५० च्या पुढे गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ.

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान

Vedanta plant in Chhattisgarh : छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; १४ कामगारांचा मृत्यू, १९ गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता

ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील

PM Modi - Trump Phone Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ