PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल, मुस्लिमांची सहानुभूती असेल तर काँग्रेस मुस्लिमाला पक्षाचा अध्यक्ष का करत नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल


हिसार : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हरियाणातील हिसारमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत धार्मिक तुष्टीकरण, वक्फ कायदा, संविधानाचा अपमान आणि मुस्लिमांच्या नेतृत्वावरील अपुऱ्या प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी काँग्रेसवर मुस्लिमांच्या नावाने केवळ लांगूलचालन केल्याचा आरोप करत विचारलं, "जर खरोखर मुस्लिमांविषयी सहानुभूती असेल, तर काँग्रेसने आजपर्यंत कधी मुस्लिम व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी का नेमलं नाही?"



मुस्लिमांचा वापर, पण नेतृत्व नाही – मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसने नेहमीच मुस्लिमांच्या नावाने केवळ मतांसाठी राजकारण केलं, पण त्यांच्या प्रगतीसाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. वक्फ कायद्यात सुधारणा करून निवडणूक गमावू नये यासाठी संविधानाच्या तत्वांवरच घाला घातला. काँग्रेसने कट्टरपंथीयांना खूश ठेवण्यासाठी बहुसंख्य मुस्लिम समाजाचं नुकसान केलं."



वक्फ कायद्यावरून काँग्रेसवर टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "२०१३ मध्ये काँग्रेसने वक्फ कायद्यात बदल करून संविधानाच्या मूल्यांना दुखावलं. जर योग्य नियोजन केलं असतं, तर आज मुस्लिमांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करत बसावं लागलं नसतं."



डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप


“आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. पण काँग्रेसने त्यांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं, त्यांच्या विचारांना गाडण्याचा प्रयत्न केला,” असा आरोपही त्यांनी केला.



आरक्षण, UCC, आणि संविधानाचं राजकारण


मोदींनी काँग्रेसवर संविधानाचा वापर सत्तेसाठी हत्यार म्हणून केल्याचा आरोप करत सांगितलं की, "काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं, एससी/एसटी/ओबीसींना न्याय मिळाला की नाही हे तपासण्याचीही कधी गरज वाटली नाही. उलट कर्नाटकमध्ये त्यांच्या सरकारने धार्मिक आरक्षण देऊन संविधानाची भावना पायदळी तुडवली."


त्याचप्रमाणे, "उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला असताना काँग्रेसने त्यालाही विरोध केला. संविधान प्रत्येक नागरिकासाठी समान कायद्याची ग्वाही देतो, पण काँग्रेसने तो निवडणुकीसाठी मोडला," असा आरोपही त्यांनी केला.



उड्डाण सेवा आणि विकासाचे वचन


या कार्यक्रमात त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करत, “चप्पल घातलेला सामान्य माणूसही आता विमान प्रवास करेल,” असे सांगितले. २०१४ पूर्वी केवळ ७४ विमानतळ होते, आता ती संख्या १५० च्या पुढे गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Amazon Great Freedom Sale 2026 : स्वातंत्र्यदिनानिमित्त Amazon ची मोठी ऑफर! ७ ऑगस्टपासून फ्रीडम सेल सुरू; पाहा काय असणार खास ?

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अ‍ॅमेझॉन'ने (Amazon) आपल्या भारतीय

Dubai-Mumbai IndiGo Flight : दुबई-मुंबई विमानाचे राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग; कार्गो होल्डमध्ये धूर दिसल्याने धावपळ

नवी दिल्ली : दुबईवरून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी

Dharmendra Pradhan : "मी एसीतला नाही, तर रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता!" काँग्रेसच्या टोमण्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार; राजीनाम्यानंतर संसदेत जंगी स्वागत

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाच्या वादात शिक्षणमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा

Bihar Student Protest : बिहार बंद आंदोलनादरम्यान गोळीबार, AK-47 वापरल्याप्रकरणी पोलीस निलंबित, व्हिडिओ व्हायरल

बिहारमध्ये पेपरफुटी प्रकरणासह (Bihar) विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या 'बिहार बंद' (Bihar Band)

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला