PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल, मुस्लिमांची सहानुभूती असेल तर काँग्रेस मुस्लिमाला पक्षाचा अध्यक्ष का करत नाही?

  51

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल


हिसार : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हरियाणातील हिसारमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत धार्मिक तुष्टीकरण, वक्फ कायदा, संविधानाचा अपमान आणि मुस्लिमांच्या नेतृत्वावरील अपुऱ्या प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी काँग्रेसवर मुस्लिमांच्या नावाने केवळ लांगूलचालन केल्याचा आरोप करत विचारलं, "जर खरोखर मुस्लिमांविषयी सहानुभूती असेल, तर काँग्रेसने आजपर्यंत कधी मुस्लिम व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी का नेमलं नाही?"



मुस्लिमांचा वापर, पण नेतृत्व नाही – मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसने नेहमीच मुस्लिमांच्या नावाने केवळ मतांसाठी राजकारण केलं, पण त्यांच्या प्रगतीसाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. वक्फ कायद्यात सुधारणा करून निवडणूक गमावू नये यासाठी संविधानाच्या तत्वांवरच घाला घातला. काँग्रेसने कट्टरपंथीयांना खूश ठेवण्यासाठी बहुसंख्य मुस्लिम समाजाचं नुकसान केलं."



वक्फ कायद्यावरून काँग्रेसवर टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "२०१३ मध्ये काँग्रेसने वक्फ कायद्यात बदल करून संविधानाच्या मूल्यांना दुखावलं. जर योग्य नियोजन केलं असतं, तर आज मुस्लिमांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करत बसावं लागलं नसतं."



डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप


“आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. पण काँग्रेसने त्यांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं, त्यांच्या विचारांना गाडण्याचा प्रयत्न केला,” असा आरोपही त्यांनी केला.



आरक्षण, UCC, आणि संविधानाचं राजकारण


मोदींनी काँग्रेसवर संविधानाचा वापर सत्तेसाठी हत्यार म्हणून केल्याचा आरोप करत सांगितलं की, "काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं, एससी/एसटी/ओबीसींना न्याय मिळाला की नाही हे तपासण्याचीही कधी गरज वाटली नाही. उलट कर्नाटकमध्ये त्यांच्या सरकारने धार्मिक आरक्षण देऊन संविधानाची भावना पायदळी तुडवली."


त्याचप्रमाणे, "उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला असताना काँग्रेसने त्यालाही विरोध केला. संविधान प्रत्येक नागरिकासाठी समान कायद्याची ग्वाही देतो, पण काँग्रेसने तो निवडणुकीसाठी मोडला," असा आरोपही त्यांनी केला.



उड्डाण सेवा आणि विकासाचे वचन


या कार्यक्रमात त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करत, “चप्पल घातलेला सामान्य माणूसही आता विमान प्रवास करेल,” असे सांगितले. २०१४ पूर्वी केवळ ७४ विमानतळ होते, आता ती संख्या १५० च्या पुढे गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली