PM Modi : कोण आहेत रामपाल कश्यप ज्यांच्या पायात मोदींनी घातले बूट ?

चंदिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभर कोट्यवधी चाहते आहेत. पण हरियाणातील कैथल येथे राहणाऱ्या रामपाल कश्यप यांची गोष्टच निराळी आहे.

रामलाल कश्यप यांनी १४ वर्षांपूर्वी शपथ घेतली की, जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत पायात चप्पल किंवा बूट घालणार नाही. अनवाणी राहणार. या शपथेचे रामलाल कश्यप प्रामाणिकपणे पालन करत होते. नरेंद्र मोदी मे २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. पण मोदींची आणि रामलाल कश्यप यांची त्यावेळी भेट झाली नव्हती. रामलाल कश्यप हे त्यांच्या शपथेवर ठाम राहिले. त्यांनी मोदींना भेटेपर्यंत अनवाणी राहण्याचा चालायचे असे स्वतःच ठरवले आणि त्या निर्णयाचे पालन सुरू केले.



अखेर सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नियोजीत हरियाणा दौऱ्याच्या निमित्ताने यमुनानगर येथे पोहोचला. हा मोदींच्या सोमवारच्या हरियाणा दौऱ्यातला दुसरा टप्पा होता. यमुनानगर येथे पंतप्रधान मोदी यांना रामलाल कश्यप भेटले. या भेटीत पंतप्रधान मोदींनी रामलाल कश्यप यांची विचारपूस केली. भविष्यात पुन्हा अनवाणी चालण्याची शपथ घेऊ नका. जर शपथ घ्यायचीच असेल तर सामाजिक कार्यासाठी, देशहितासाठी घ्या; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यानंतर पंतप्रधान मोदींनी यांनी रामलाल कश्यप यांच्या पायात बूट घातले.



पंतप्रधान मोदी हे हरियाणा भाजपाचे प्रभारी होते त्या काळात अनेकदा हरियाणातील यमुनानगर येथे येत - जात होते. आता यमुनानगर प्लायवूड, पितळ, स्टील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे योगदान देऊन देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत आहे. हे सर्व समजल्यामुळे आनंद झाल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.





कोण आहेत रामलाल कश्यप ?

रामलाल कश्यप हे हरियाातील कैथल जिल्ह्यातील खेडी गुलाम अली या गावातले रहिवासी आहेत. ते भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. याआधी ते काही काळ भाजपाचे मंडळ अध्यक्ष पण होते. मजूर असलेले असलेल्या रामलाल कश्यप यांच्या कुटुंबात पत्नी तसेच दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. रामलाल कश्यप ५५ वर्षांचे आहेत. त्यांनी सांगितले की १८ व्या वर्षी मतदार झाल्यापासून अनेकदा मतदान केले. कायम देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पक्षालाच मतदान केल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदींशी झालेली भेट आयुष्यभर आठवणीत राहील, असे रामलाल कश्यप म्हणाले. मोदींना भेटण्यासाठी रामलाल कश्यप यांनी भाजपाचे माजी आमदार कुलवंत राम बाजीगर यांना पत्र लिहिले होते आणि घेतलेल्या शपथेच तसेच करत असलेल्या कृतीची माहिती दिली होती. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी हरियाणा दौऱ्याच्या निमित्ताने मोदी आणि रामलाल कश्यप यांची भेट व्हावी यासाठीचे नियोजन केले.
Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू