PM Modi : कोण आहेत रामपाल कश्यप ज्यांच्या पायात मोदींनी घातले बूट ?

चंदिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभर कोट्यवधी चाहते आहेत. पण हरियाणातील कैथल येथे राहणाऱ्या रामपाल कश्यप यांची गोष्टच निराळी आहे.

रामलाल कश्यप यांनी १४ वर्षांपूर्वी शपथ घेतली की, जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत पायात चप्पल किंवा बूट घालणार नाही. अनवाणी राहणार. या शपथेचे रामलाल कश्यप प्रामाणिकपणे पालन करत होते. नरेंद्र मोदी मे २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. पण मोदींची आणि रामलाल कश्यप यांची त्यावेळी भेट झाली नव्हती. रामलाल कश्यप हे त्यांच्या शपथेवर ठाम राहिले. त्यांनी मोदींना भेटेपर्यंत अनवाणी राहण्याचा चालायचे असे स्वतःच ठरवले आणि त्या निर्णयाचे पालन सुरू केले.



अखेर सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नियोजीत हरियाणा दौऱ्याच्या निमित्ताने यमुनानगर येथे पोहोचला. हा मोदींच्या सोमवारच्या हरियाणा दौऱ्यातला दुसरा टप्पा होता. यमुनानगर येथे पंतप्रधान मोदी यांना रामलाल कश्यप भेटले. या भेटीत पंतप्रधान मोदींनी रामलाल कश्यप यांची विचारपूस केली. भविष्यात पुन्हा अनवाणी चालण्याची शपथ घेऊ नका. जर शपथ घ्यायचीच असेल तर सामाजिक कार्यासाठी, देशहितासाठी घ्या; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यानंतर पंतप्रधान मोदींनी यांनी रामलाल कश्यप यांच्या पायात बूट घातले.



पंतप्रधान मोदी हे हरियाणा भाजपाचे प्रभारी होते त्या काळात अनेकदा हरियाणातील यमुनानगर येथे येत - जात होते. आता यमुनानगर प्लायवूड, पितळ, स्टील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे योगदान देऊन देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत आहे. हे सर्व समजल्यामुळे आनंद झाल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.





कोण आहेत रामलाल कश्यप ?

रामलाल कश्यप हे हरियाातील कैथल जिल्ह्यातील खेडी गुलाम अली या गावातले रहिवासी आहेत. ते भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. याआधी ते काही काळ भाजपाचे मंडळ अध्यक्ष पण होते. मजूर असलेले असलेल्या रामलाल कश्यप यांच्या कुटुंबात पत्नी तसेच दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. रामलाल कश्यप ५५ वर्षांचे आहेत. त्यांनी सांगितले की १८ व्या वर्षी मतदार झाल्यापासून अनेकदा मतदान केले. कायम देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पक्षालाच मतदान केल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदींशी झालेली भेट आयुष्यभर आठवणीत राहील, असे रामलाल कश्यप म्हणाले. मोदींना भेटण्यासाठी रामलाल कश्यप यांनी भाजपाचे माजी आमदार कुलवंत राम बाजीगर यांना पत्र लिहिले होते आणि घेतलेल्या शपथेच तसेच करत असलेल्या कृतीची माहिती दिली होती. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी हरियाणा दौऱ्याच्या निमित्ताने मोदी आणि रामलाल कश्यप यांची भेट व्हावी यासाठीचे नियोजन केले.
Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर