ठाण्यात तब्बल ५०९ बांगलादेशींना अटक

ठाणे : अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील घरात एका बांगलादेशीने हल्ला केल्याची घटना अलीकडेच घडली. त्यानंतर बांगलादेशींवरील कारवाई मुंबई आणि ठाण्यात तीव्र झाली. कारवाईची धार अलीकडेच तीव्र झाली असली तरी गेल्या दहा वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात तब्बल ५०९ बांगलादेशींवर कारवाई झाली.
ठाण्यातील अनेक बांधकामांच्या ठिकाणी बांगलादेशी पुरुष मजूर म्हणून काम करतात, तर महिला बारमध्ये गायक किंवा वेट्रेस म्हणून काम करतात.


काही महिलांनी घर चालविण्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय पत्करल्याची माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे. महाराष्ट्रात सैफ अली हल्ल्यासारखे आणखी काही धक्कादायक प्रकार निदर्शनास आले. अनेक बांगलादेशी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेही असल्याची बाब पाहण्यात आली. तुलनेत हे मजूर स्वस्त, कुशल तसेच अंगमेहनती असल्यानेही त्यांना कामावर ठेवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागते. ठाण्याचे खा. नरेश म्हस्के आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मागणीनंतर केंद्र सरकारने या बांगलादेशींविरुद्धची मोहीम तीव्र केली.



मेघालय, पश्चिम बंगाल यांच्या सीमेवरील चेक पोस्ट चुकवून ते घुसखोरी करतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनवितात. त्यानंतर ते कोलकातामार्गे मुंबई, ठाणे आणि पुणे गाठतात.दहा वर्षातच पोलिसांनी कारवाई केलेल्या बांगलादेशी घुसखोरींची संख्या ५०९ इतकी आहे. सैफ अलीच्या प्रकरणानंतर ठाण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई तीव्र केली. ४३ गुन्हे दाखल झाले असून ८६ जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर