ठाण्यात तब्बल ५०९ बांगलादेशींना अटक

ठाणे : अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील घरात एका बांगलादेशीने हल्ला केल्याची घटना अलीकडेच घडली. त्यानंतर बांगलादेशींवरील कारवाई मुंबई आणि ठाण्यात तीव्र झाली. कारवाईची धार अलीकडेच तीव्र झाली असली तरी गेल्या दहा वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात तब्बल ५०९ बांगलादेशींवर कारवाई झाली.
ठाण्यातील अनेक बांधकामांच्या ठिकाणी बांगलादेशी पुरुष मजूर म्हणून काम करतात, तर महिला बारमध्ये गायक किंवा वेट्रेस म्हणून काम करतात.


काही महिलांनी घर चालविण्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय पत्करल्याची माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे. महाराष्ट्रात सैफ अली हल्ल्यासारखे आणखी काही धक्कादायक प्रकार निदर्शनास आले. अनेक बांगलादेशी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेही असल्याची बाब पाहण्यात आली. तुलनेत हे मजूर स्वस्त, कुशल तसेच अंगमेहनती असल्यानेही त्यांना कामावर ठेवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागते. ठाण्याचे खा. नरेश म्हस्के आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मागणीनंतर केंद्र सरकारने या बांगलादेशींविरुद्धची मोहीम तीव्र केली.



मेघालय, पश्चिम बंगाल यांच्या सीमेवरील चेक पोस्ट चुकवून ते घुसखोरी करतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनवितात. त्यानंतर ते कोलकातामार्गे मुंबई, ठाणे आणि पुणे गाठतात.दहा वर्षातच पोलिसांनी कारवाई केलेल्या बांगलादेशी घुसखोरींची संख्या ५०९ इतकी आहे. सैफ अलीच्या प्रकरणानंतर ठाण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई तीव्र केली. ४३ गुन्हे दाखल झाले असून ८६ जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत